शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अभियंत्यांना जाब विचारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 21:47 IST

पोलीस संरक्षणात पुलाचे काम सुरु करा : तळवणे-वेळवेवाडीतील ग्रामस्थ झाले आक्रमक

मळेवाड : बहुचर्चित तळवणे-वेळवेवाडी पुलाचे काम गेले पंधरा दिवस बंद आहे. प्रसंगी पोलीस संरक्षण घ्या, पण काम सुरू करावे, अशी आक्रमक मागणी तळवणे ग्रामस्थांनी केली. तळवणेवासियांनी सावंतवाडी उपविभागीय कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घालून पुलाचे बंद कामाबाबत जाब विचारत घेराव घातला. तळवणे परिसरातील महत्वाचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या या पुलासाठी गेली ३५ वर्षे पंचक्रोशी संघर्ष करीत आहे. २०१३ मध्ये अखेर काम सरू झाले. पण गेल्या पंधरा दिवसापासून हे काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम सुरू केव्हा करणार, यावर योग्य निर्णय कधी घेण्यात येणार यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत पुलाचे काम सुरू करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली. यावर कार्यालयातील अभियंता चव्हाण यांनी आम्हाला काम सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही. पण काही लोक काम बंद पाडतात. यावर ग्रामस्थांनी काम सुरू करण्यासाठी घटनास्थळी पोलीस संरक्षण घ्या. अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करा आणि काम पूर्ण करा, अशी मागणी केली. यावर सोमवारपर्यंत राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून काम सुरू करणार, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. भूसंपादनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, ना शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले. प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आश्वासने देतात आणि अधिकारी वर्ग पुलाचे काम ८० टक्के झाले, असे सांगतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. यावेळी तळवणे सरपंच मिलिंद कांबळी, ग्रामस्थ बाळकृष्ण कांबळी, गोविंद केरकर, मोहन कांबळी, शरद हरमलकर, रामदास कांबळी, संजय साळगावकर, भगवान शेंडेकर, रमाकांत कांबळी, नकुल कांबळी, पांडुरंग नाईक, लवू कांबळी, अनंत साळगावकर, भरत कांबळी, विलास साळगावकर, प्रकाश कांबळी, सुनील कांबळी यासह शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, दिलीप सोनुर्लेकर, चंद्रकांत कासार यांनी ग्रामस्थांच्यावतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आपल्या माडबागायतीवर पाणी सोडून पुलासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्या हाती अद्याप एक छदामी पडला नाही, याचासुद्धा काहीच विचार करण्यात आला नाही. (वार्ताहर) पाने पुसण्याचेच कार्य तळवणे वेळवेवाडी पूल हे गेली ३५ वर्षे प्रकाशझोतात आहे. पूल पूर्ण कधी होणार, याकडे ग्रामस्थ डोळे लावून आहेत. पण प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन अधिकारी यांच्याकडून त्यांना पाने पुसण्याचे काम झाले आहे.