शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उपविभागीय अभियंत्यांना जाब विचारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 21:47 IST

पोलीस संरक्षणात पुलाचे काम सुरु करा : तळवणे-वेळवेवाडीतील ग्रामस्थ झाले आक्रमक

मळेवाड : बहुचर्चित तळवणे-वेळवेवाडी पुलाचे काम गेले पंधरा दिवस बंद आहे. प्रसंगी पोलीस संरक्षण घ्या, पण काम सुरू करावे, अशी आक्रमक मागणी तळवणे ग्रामस्थांनी केली. तळवणेवासियांनी सावंतवाडी उपविभागीय कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घालून पुलाचे बंद कामाबाबत जाब विचारत घेराव घातला. तळवणे परिसरातील महत्वाचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या या पुलासाठी गेली ३५ वर्षे पंचक्रोशी संघर्ष करीत आहे. २०१३ मध्ये अखेर काम सरू झाले. पण गेल्या पंधरा दिवसापासून हे काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम सुरू केव्हा करणार, यावर योग्य निर्णय कधी घेण्यात येणार यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत पुलाचे काम सुरू करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली. यावर कार्यालयातील अभियंता चव्हाण यांनी आम्हाला काम सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही. पण काही लोक काम बंद पाडतात. यावर ग्रामस्थांनी काम सुरू करण्यासाठी घटनास्थळी पोलीस संरक्षण घ्या. अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करा आणि काम पूर्ण करा, अशी मागणी केली. यावर सोमवारपर्यंत राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून काम सुरू करणार, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. भूसंपादनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, ना शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले. प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आश्वासने देतात आणि अधिकारी वर्ग पुलाचे काम ८० टक्के झाले, असे सांगतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. यावेळी तळवणे सरपंच मिलिंद कांबळी, ग्रामस्थ बाळकृष्ण कांबळी, गोविंद केरकर, मोहन कांबळी, शरद हरमलकर, रामदास कांबळी, संजय साळगावकर, भगवान शेंडेकर, रमाकांत कांबळी, नकुल कांबळी, पांडुरंग नाईक, लवू कांबळी, अनंत साळगावकर, भरत कांबळी, विलास साळगावकर, प्रकाश कांबळी, सुनील कांबळी यासह शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, दिलीप सोनुर्लेकर, चंद्रकांत कासार यांनी ग्रामस्थांच्यावतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आपल्या माडबागायतीवर पाणी सोडून पुलासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्या हाती अद्याप एक छदामी पडला नाही, याचासुद्धा काहीच विचार करण्यात आला नाही. (वार्ताहर) पाने पुसण्याचेच कार्य तळवणे वेळवेवाडी पूल हे गेली ३५ वर्षे प्रकाशझोतात आहे. पूल पूर्ण कधी होणार, याकडे ग्रामस्थ डोळे लावून आहेत. पण प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन अधिकारी यांच्याकडून त्यांना पाने पुसण्याचे काम झाले आहे.