शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी,पालकांचा ठिय्या

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

शाळा सोडल्याचे दाखले अडविले : पाट हायस्कूलमधील प्रकार

सिंधुदुर्गनगरी : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले अडवून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडून केले जात आहे. या मनमानी कारभाराविरोधात न्याय मागण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील पाट हायस्कूलच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले फी भरण्याच्या कारणावरून रोखून ठेवण्यात आले आहेत. या विरोधात बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर संबंधित विद्यार्थी व पालक यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामध्ये महेश वेळकर, मकरंद मराळ हे पालक, स्वप्नील गवाणकर, ओमकार म्हापणकर, लक्ष्मण वेळकर, अनिकेत गोवेकर, शुभम हळदणकर, कृष्णा गावडे हे विद्यार्थी यासह २० ते २५ उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.मुख्याध्यापक व काही मोजके सभासद यांची सभा घेऊन निश्चित करण्यात आलेली १० हजार ५०० रुपये एवढी फी भरणे गरीब पालकांना परवडणारी नाही. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फीच्या कारणावरून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले अडवून ठेवले आहेत. या विरोधात संबंधित विद्यार्थी व पालकांनी बुधवारपासून जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जादा फी न भरल्याने दाखले रोखले. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)पालकांचे म्हणणेमाध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळावा म्हणून पाट हायस्कूलकडे रितसर अर्ज केला होता. मात्र, दाखले आणण्यासाठी गेलो असता पूर्ण फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असे संस्थेकडून सांगण्यात आले. शासकीय नियमानुसार होणारी फी भरण्यास आम्ही तयारी दर्शविली असता पालक सभेमध्ये ठरविल्याप्रमाणे १० हजार ५०० रुपये फी भरत नाही तोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशी भूमिका पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असून यासाठी दाखले रोखून ठेवले आहेत असे या पालकांचे म्हणणे आहे.