शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

विद्यार्थी,पालकांचा ठिय्या

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

शाळा सोडल्याचे दाखले अडविले : पाट हायस्कूलमधील प्रकार

सिंधुदुर्गनगरी : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले अडवून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडून केले जात आहे. या मनमानी कारभाराविरोधात न्याय मागण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील पाट हायस्कूलच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले फी भरण्याच्या कारणावरून रोखून ठेवण्यात आले आहेत. या विरोधात बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर संबंधित विद्यार्थी व पालक यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामध्ये महेश वेळकर, मकरंद मराळ हे पालक, स्वप्नील गवाणकर, ओमकार म्हापणकर, लक्ष्मण वेळकर, अनिकेत गोवेकर, शुभम हळदणकर, कृष्णा गावडे हे विद्यार्थी यासह २० ते २५ उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.मुख्याध्यापक व काही मोजके सभासद यांची सभा घेऊन निश्चित करण्यात आलेली १० हजार ५०० रुपये एवढी फी भरणे गरीब पालकांना परवडणारी नाही. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फीच्या कारणावरून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले अडवून ठेवले आहेत. या विरोधात संबंधित विद्यार्थी व पालकांनी बुधवारपासून जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जादा फी न भरल्याने दाखले रोखले. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)पालकांचे म्हणणेमाध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळावा म्हणून पाट हायस्कूलकडे रितसर अर्ज केला होता. मात्र, दाखले आणण्यासाठी गेलो असता पूर्ण फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असे संस्थेकडून सांगण्यात आले. शासकीय नियमानुसार होणारी फी भरण्यास आम्ही तयारी दर्शविली असता पालक सभेमध्ये ठरविल्याप्रमाणे १० हजार ५०० रुपये फी भरत नाही तोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशी भूमिका पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असून यासाठी दाखले रोखून ठेवले आहेत असे या पालकांचे म्हणणे आहे.