शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सातुळी-बावळाटला वादळाचा फटका

By admin | Updated: October 17, 2014 23:53 IST

लाखोंचे नुकसान : अनेक घरांवर झाडे कोसळली; पावसाने भातशेती धोक्यात

ओटवणे : ओटवणे दशक्रोशीतील सातुळी- बावळाट या गावांना दुपारी मुसळधार वृष्टीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. दुपारी तीन वाजता केवळ दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे बावळाट-मुलांडावाडी येथील उत्तम ठाकूर यांचे राहते घर, दुकान यावर दोन भले मोठे माड कोसळल्याने घर व दुकानांची पडझड होऊन सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. काही घरांच्या पडझडीचे प्रकार घडल्याने लाखोंची हानी झाली आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बावळाट- मुलांडावाडी येथील पार्वती राऊळ, गंगाबाई परब यांच्या घरांवर व शेत मांगरावर शिवन व फणसाचे झाड पडल्याने व वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही भेगा पडून नुकसान झाले. सातुळी-बावळाट येथील पोलीसपाटील अरुण परब यांच्या घराचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. जगन्नाथ परब, विजय परब, प्रवीण परब यांची वैयक्तिक मालकीची झाडे कोसळली व घरांवरही पडली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या वादळामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नुकसान ग्रामस्थांना सोसावे लागले. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पंचायत समितीचे सदस्य राघोजी सावंत, बावळाटचे सरपंच सूर्यकांत परब, उपसरपंच प्रभावती कानसे, पोलीसपाटील आबा परब, कांता पांगम, तलाठी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कणकवली परिसरात मेघगर्जनेसह पाऊसनवरात्रौत्सवानंतर गायब झालेल्या पावसाने आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. त्यामुळे भातकापणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दहा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यात कणकवली टेंबवाडीनजीक एका घरावर वीज पडली होती. पावसाळी हंगामातील भातशेती सध्या कापणीला योग्य आहे. त्यातच निवडणूकही आटोपल्याने शेतकरी सध्या भातकापणीमध्ये मग्न आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आॅक्टोबर हिट जाणवत असल्याने उशिरा लावणी केलेली भातशेतीही कापणीस योग्य झाली आहे. मात्र, अचानक कापणी करून ठेवलेल्या अथवा कापणीस योग्य असलेल्या भातरोपांवर पडत असलेल्या पावसाने पाणी पडून भाताची केसर झडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.