शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातुळी-बावळाटला वादळाचा फटका

By admin | Updated: October 17, 2014 23:53 IST

लाखोंचे नुकसान : अनेक घरांवर झाडे कोसळली; पावसाने भातशेती धोक्यात

ओटवणे : ओटवणे दशक्रोशीतील सातुळी- बावळाट या गावांना दुपारी मुसळधार वृष्टीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. दुपारी तीन वाजता केवळ दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे बावळाट-मुलांडावाडी येथील उत्तम ठाकूर यांचे राहते घर, दुकान यावर दोन भले मोठे माड कोसळल्याने घर व दुकानांची पडझड होऊन सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. काही घरांच्या पडझडीचे प्रकार घडल्याने लाखोंची हानी झाली आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बावळाट- मुलांडावाडी येथील पार्वती राऊळ, गंगाबाई परब यांच्या घरांवर व शेत मांगरावर शिवन व फणसाचे झाड पडल्याने व वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही भेगा पडून नुकसान झाले. सातुळी-बावळाट येथील पोलीसपाटील अरुण परब यांच्या घराचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. जगन्नाथ परब, विजय परब, प्रवीण परब यांची वैयक्तिक मालकीची झाडे कोसळली व घरांवरही पडली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या वादळामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नुकसान ग्रामस्थांना सोसावे लागले. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पंचायत समितीचे सदस्य राघोजी सावंत, बावळाटचे सरपंच सूर्यकांत परब, उपसरपंच प्रभावती कानसे, पोलीसपाटील आबा परब, कांता पांगम, तलाठी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कणकवली परिसरात मेघगर्जनेसह पाऊसनवरात्रौत्सवानंतर गायब झालेल्या पावसाने आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. त्यामुळे भातकापणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दहा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यात कणकवली टेंबवाडीनजीक एका घरावर वीज पडली होती. पावसाळी हंगामातील भातशेती सध्या कापणीला योग्य आहे. त्यातच निवडणूकही आटोपल्याने शेतकरी सध्या भातकापणीमध्ये मग्न आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आॅक्टोबर हिट जाणवत असल्याने उशिरा लावणी केलेली भातशेतीही कापणीस योग्य झाली आहे. मात्र, अचानक कापणी करून ठेवलेल्या अथवा कापणीस योग्य असलेल्या भातरोपांवर पडत असलेल्या पावसाने पाणी पडून भाताची केसर झडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.