शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

सातुळी-बावळाटला वादळाचा फटका

By admin | Updated: October 17, 2014 23:53 IST

लाखोंचे नुकसान : अनेक घरांवर झाडे कोसळली; पावसाने भातशेती धोक्यात

ओटवणे : ओटवणे दशक्रोशीतील सातुळी- बावळाट या गावांना दुपारी मुसळधार वृष्टीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. दुपारी तीन वाजता केवळ दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे बावळाट-मुलांडावाडी येथील उत्तम ठाकूर यांचे राहते घर, दुकान यावर दोन भले मोठे माड कोसळल्याने घर व दुकानांची पडझड होऊन सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. काही घरांच्या पडझडीचे प्रकार घडल्याने लाखोंची हानी झाली आहे.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बावळाट- मुलांडावाडी येथील पार्वती राऊळ, गंगाबाई परब यांच्या घरांवर व शेत मांगरावर शिवन व फणसाचे झाड पडल्याने व वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही भेगा पडून नुकसान झाले. सातुळी-बावळाट येथील पोलीसपाटील अरुण परब यांच्या घराचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. जगन्नाथ परब, विजय परब, प्रवीण परब यांची वैयक्तिक मालकीची झाडे कोसळली व घरांवरही पडली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या वादळामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नुकसान ग्रामस्थांना सोसावे लागले. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पंचायत समितीचे सदस्य राघोजी सावंत, बावळाटचे सरपंच सूर्यकांत परब, उपसरपंच प्रभावती कानसे, पोलीसपाटील आबा परब, कांता पांगम, तलाठी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कणकवली परिसरात मेघगर्जनेसह पाऊसनवरात्रौत्सवानंतर गायब झालेल्या पावसाने आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. त्यामुळे भातकापणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दहा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यात कणकवली टेंबवाडीनजीक एका घरावर वीज पडली होती. पावसाळी हंगामातील भातशेती सध्या कापणीला योग्य आहे. त्यातच निवडणूकही आटोपल्याने शेतकरी सध्या भातकापणीमध्ये मग्न आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आॅक्टोबर हिट जाणवत असल्याने उशिरा लावणी केलेली भातशेतीही कापणीस योग्य झाली आहे. मात्र, अचानक कापणी करून ठेवलेल्या अथवा कापणीस योग्य असलेल्या भातरोपांवर पडत असलेल्या पावसाने पाणी पडून भाताची केसर झडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.