शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

By admin | Updated: May 12, 2017 23:08 IST

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

रत्नागिरी : गरिबीमुळे १७ वर्षीय मुलीचे लग्न करण्याचा राजापूर तालुक्यातील एका कुटुंबाचा प्रयत्न शुक्रवारी रत्नागिरीतील चाईल्ड लाईन संस्थेच्या जागरूक पदाधिकाऱ्यांनी रोखला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने १६ मे रोजी होणारा हा विवाह थांबविण्यात आला असून, मुला-मुलीच्या नातेवाइकांना समज देण्यात आली आहे.चाईल्ड लाईनच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात एक निनावी फोन आला. राजापूर तालुक्यातील एका गावात मे महिन्यात अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी मुंबईतील प्रमुखांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालकल्याण समितीलाही याची माहिती देण्यात आली. आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच लग्नाची पत्रिका मिळवून संबंधित नावाची खात्री केली गेली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व बालकल्याण समितीला पत्र पाठवून मार्गदर्शन घेण्यात आले.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार राजापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक गावडे यांनी सोबत दिलेले कॉन्स्टेबल, महिला बालकल्याणचे पदाधिकारी व चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी अशा सर्वांनी मुलीचे घर गाठले. घरात आई, आजोबा, मुलगी होती. वडील कामासाठी बाहेर गेले होते. सर्व लवाजमा घरी पोहोचल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. बालविवाह, त्याचे दुष्परिणाम, त्याच्या कायदेशीर बाजू याबाबत सर्व माहिती त्या कुटुंबीयांना तसेच गावातील मंडळींना देण्यात आली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांना राजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे वराकडील सर्व मंडळींनाही बोलाविण्यात आले. मुलीची जन्मतारीख २९ फेब्रुवारी २००० असून, ती अवघी १७ वर्षे ४ महिने असल्याचे समजावून दिले. मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची समज देऊन दोन्हीकडच्या नातेवाइकांचे लेखी जबाब घेण्यात आले. मुलगी १७ वर्षांची, तर मुलगा २३ वर्षे होता. दि. ४ मे रोजी साखरपुडाही झाला होता. केवळ मुलीच्या अल्पवयामुळे आता विवाह करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर सर्व मंडळी तयार झाली व चाईल्ड लाईनच्या प्रयत्नांना यश आले.बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, राजापूरचे पोलीस निरीक्षक गावडे, लांजा महिला बालकल्याणचे संरक्षण अधिकारी, रत्नागिरी चाईल्ड लाईनचे संचालक नौमान नाईक, जिल्हा समन्वयक पी. एल. नंदीवाले, नितीश शेट्ये, आेंकार नागवेकर, तंजीन काजी, अभिषेक भुते यांनी हा बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला.