शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

By admin | Updated: May 12, 2017 23:08 IST

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

रत्नागिरी : गरिबीमुळे १७ वर्षीय मुलीचे लग्न करण्याचा राजापूर तालुक्यातील एका कुटुंबाचा प्रयत्न शुक्रवारी रत्नागिरीतील चाईल्ड लाईन संस्थेच्या जागरूक पदाधिकाऱ्यांनी रोखला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने १६ मे रोजी होणारा हा विवाह थांबविण्यात आला असून, मुला-मुलीच्या नातेवाइकांना समज देण्यात आली आहे.चाईल्ड लाईनच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात एक निनावी फोन आला. राजापूर तालुक्यातील एका गावात मे महिन्यात अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी मुंबईतील प्रमुखांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालकल्याण समितीलाही याची माहिती देण्यात आली. आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच लग्नाची पत्रिका मिळवून संबंधित नावाची खात्री केली गेली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व बालकल्याण समितीला पत्र पाठवून मार्गदर्शन घेण्यात आले.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार राजापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक गावडे यांनी सोबत दिलेले कॉन्स्टेबल, महिला बालकल्याणचे पदाधिकारी व चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी अशा सर्वांनी मुलीचे घर गाठले. घरात आई, आजोबा, मुलगी होती. वडील कामासाठी बाहेर गेले होते. सर्व लवाजमा घरी पोहोचल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. बालविवाह, त्याचे दुष्परिणाम, त्याच्या कायदेशीर बाजू याबाबत सर्व माहिती त्या कुटुंबीयांना तसेच गावातील मंडळींना देण्यात आली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांना राजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे वराकडील सर्व मंडळींनाही बोलाविण्यात आले. मुलीची जन्मतारीख २९ फेब्रुवारी २००० असून, ती अवघी १७ वर्षे ४ महिने असल्याचे समजावून दिले. मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची समज देऊन दोन्हीकडच्या नातेवाइकांचे लेखी जबाब घेण्यात आले. मुलगी १७ वर्षांची, तर मुलगा २३ वर्षे होता. दि. ४ मे रोजी साखरपुडाही झाला होता. केवळ मुलीच्या अल्पवयामुळे आता विवाह करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर सर्व मंडळी तयार झाली व चाईल्ड लाईनच्या प्रयत्नांना यश आले.बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, राजापूरचे पोलीस निरीक्षक गावडे, लांजा महिला बालकल्याणचे संरक्षण अधिकारी, रत्नागिरी चाईल्ड लाईनचे संचालक नौमान नाईक, जिल्हा समन्वयक पी. एल. नंदीवाले, नितीश शेट्ये, आेंकार नागवेकर, तंजीन काजी, अभिषेक भुते यांनी हा बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला.