शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोकणवासीयांसाठी आशादायी ठरलेला राज्याचा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 18, 2017 22:34 IST

रत्नागिरीकरांच्या प्रतिक्रिया : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद...

रत्नागिरी : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद, काजू, नारळावरील कर कमी अशा विविध तरतुदींचा कोकणला फायदा होईल. त्यामुळे शनिवारी मांडलेला राज्य अर्थसंकल्प कोकणसाठी फायदेशीर असल्याचा सूर रत्नागिरीकरांनी प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केला.सध्या राज्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केल्याचे अनेक रत्नागिरीकरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)जनतेच्या आशा पल्लवित करणारा अर्थसंकल्पशासनाच्या ध्येयधोरणाशी एकरूप होऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला. कोकण विकास महामंडळ निर्मिती नक्कीच स्वागतार्ह आहे. काजूसाठीची तरतूद कोकणचे अर्थकारण गतीमान करण्यास मदत होईल. जलयुक्त शिवारसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांनाच दिलासा देणारा आहे. आव्हानात्मक परिस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प कोकणाला न्याय देणारा असल्यामुळे जनता नक्कीच त्याचे स्वागत करेल. शामराव पेजे महामंडळाला केलेली तरतूद न्याय्य आहे. - अ‍ॅड. दीपक पटवर्धन,अध्यक्ष, स्वामी स्वरुपानंद पतसंस्था, रत्नागिरी.कोकण विकास महामंडळाची आवश्यकताआतापर्यंत कोकण विकास महामंडळाची घोषणा वारंवार झाली. परंतु, निधी अभावी महामंडळाची घोषणा हवेत विरली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महामंडळ नक्कीच फायदेशीर ठरेल. महामंडळाची घोषणा करून निधीची तरतूद करण्यात येणार असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील.- एम. ए. काजी, शेतकरी.ग्रेडिंगचा पर्याय कोकणासाठी अर्थसंकल्पातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आंबा उत्पादन खर्चिक असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काजूसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोकणाला अर्थाजन मिळवून देणाऱ्या आंब्याचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. यावर अर्थसंकल्पात तरतूद होणे महत्त्वाचे होते.- अविनाश प्रभूमहाजन, शेतकरीशेतकऱ्यांना फायदेशीर अर्थसंकल्पअर्थसंकल्प निश्चित उत्तम असून, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. काजू, नारळावरील कर कमी केल्यामुळे दरदेखील खाली येतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल. विमानसेवा महत्त्वाच्या प्रत्येक शहरासाठी आहे. जलवाहतुकीमध्ये कार्गोसेवा सुरू केली तर आंबा पाठविण्यासाठी त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.- आनंद देसाई,उद्योजक, पावसशेतकरी, सामान्यांचा विचार केलेला अर्थसंकल्पकोकणातील अतिशय महत्त्वाचे पीक असलेल्या कोकम (आमसुले) आणि नारळ यांना पूर्णपणे करसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात यावरील उद्योग वाढीस लागतील. बऱ्याच बाबतीत करमाफी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच विविध जीवनोपयोगी वस्तूंवरील करमाफीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. एकंदरीत, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा विचार केला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. - अ‍ॅड.कल्पलता भिडेबंदरे, मत्स्योत्पादनासाठी विशेष घोषणा नाही...सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी तरतूद केली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन विकास वाढणार आहे. तसेच महाराष्ट्रातील रेल्वे मार्गासाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे.यात कोकणसाठी किती, ते कळायला हवे. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. त्यात मुंबई उपकेंद्राला काही भाग मिळाल्यास कोकणला त्याचा फायदा होईल. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत, त्या दिसताना चांगल्या दिसत असल्या तरी त्याच्या शेतमालाच्या दृष्टीने मूळ उपाययोजनांसाठी आवश्यक तरतूद दिसत नाही. कोकणातील बंदरे तसेच मत्स्योत्पादनासाठी मात्र विशेष अशी कोणतीही घोषणा दिसत नाही. - प्रा. उदय बोडस