शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सिंधुदुर्गात अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प

By admin | Updated: June 3, 2015 01:25 IST

दीपक केसरकर : २० कोटी खर्च अपेक्षित

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातपीक शेतकऱ्यांकरिता २० कोटी खर्चाचा कुडाळ एमआयडीसी येथे अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प येत्या एक वर्षात कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ व ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी केसरकर यांनी संवाद साधला. व्हिलेज टुरिझम अंतर्गत तेरेखोल-आरोंदा खाडी, कर्ली कालावल, विजयदुर्ग खाडी यामध्ये वॉटर टुरिझम राबविले जाणार असून, यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. परुळे गावाला भारतातील पहिला स्वच्छ गाव म्हणून पुरस्कार मिळाल्याने या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाणार आहे. याचबरोबर आरोंदा, कवठणी, तोंडवळी, हडी, मसुरे, विजयदुर्ग, रामेश्वर-गिर्ये, पडेल येथेही पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सुमारे ९ कोटी व्हिलेज टुरिझम विकास करण्याकरिता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या चारही जिल्ह्यांत पर्यटन प्रकल्प हाती घेतले जाणार आहे.इंडो इस्राईल प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजना दुसरा टप्पा या कार्यक्रमांतर्गत कृषी खाते व फळ संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून आंबा पिकाला उद्भवणारे फळ गळ, डाग या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याकरिता केंद्राच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याकरिता वेंगुर्लेत प्रायोगिक तत्त्वावर आंबा झाडांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)वेंगुर्लेत अत्याधुनिक रुग्णालय वेंगुर्ले येथे आरोग्याचा प्रश्न सोडविण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत ५० कॉटचे सुमारे ७ कोटी ५१ लाख खर्चाचे अत्याधुनिक रुग्णालय त्याचबरोबर डायलेसिस सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सध्याच्या जुन्या इमारतीत चायनिज रिसर्च सेंटर उभारून त्याला डॉ. द्वारकानाथ कोटणीस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर वेंगुर्लेत मच्छिमारांकरिता व्हिलेज टुरिझम अंतर्गत नवाबाग खाडी येथे सुमारे २ कोटी ३१ लाख खर्चाचे झुलते पूल उभारले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.