शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

रस्त्यांच्या डागडुजीसाठी एस. टी. सेवा बंद

By admin | Updated: February 18, 2015 23:50 IST

विद्यार्थ्यांची गैरसोय : शाळा गाठण्यासाठी पायी प्रवास करण्याची आली वेळ..

रत्नागिरी : पाली पंचक्रोशीतील वळके, कशेळी कोंड, पाथरट, निवसर (ता. लांजा) या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तसेच पूल, मोऱ्या यांची कामे सुरू असल्याने या गावातील रस्ते बंद असल्याने एस. टी. बस सेवाही बंद आहे. त्याचा मोठा फटका या गावातील शालेय विद्यार्थी, नागरिक यांना बसत आहे.पाली - वळके या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेले काही महिने सुरू असून, त्यात रस्ता खोदाई, तसेच मोऱ्या घालण्याचे काम सुरु असल्याने या मार्गावरील एस. टी. बसच्या नेहमीच्या पाच फेऱ्या बंद आहेत. तसेच पाली - कशेळी कोंड या रस्त्याच्या कामामुळेही गेले काही दिवस एस. टी. बस कशेळी धारेपर्यंत जात आहे. त्यामुळे पुढील कोंड तसेच वाडीतील प्रवाशांना यामुळे पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच सर्वांत महत्त्वाचा व रेल्वेस्थानकाला जोडणारा पाली निवसर रस्ताही पाथरट - नागझरी येथील मोठ्या नवीन पुलाच्या बांधकाम व भराव घालण्यामुळे हा रस्ता मोठ्या वाहनांना बंद करण्यात आल्याने, त्या कारणास्तव या गावातीलही एस. टी. बसच्या दररोजच्या सहा फेऱ्या बंद असल्याने पाथरट, निवसर या गावातील नागरिक, विद्यार्थी यांना पाली-निवसर हा सहा किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे.सध्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने व हा रस्ता बंद असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, ही कामे तातडीने पूर्ण करुन एसटी पूर्ववत करण्याची मागणी वळके, कशेळी, पाथरट, निवसर येथील ग्रामस्थांनी केली आहे. निदान बोर्डाच्या परीक्षा सुरु होण्याअगोदर एसटीची सोय व्हावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तसेच शिमगोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. यामध्ये एस. टी. महामंडळाच्या या महत्त्वाच्या एस. टी. फेऱ्या बंद असल्याने दररोज हजारोंचे नुकसान होत आहे. तसेच छोट्या वडाप व्यावसायिकांचे मात्र यामध्ये फावत असून ते दुप्पट तिप्पट भाडे आकारुन वाहतूक करीत आहेत. त्यामध्ये प्रवाशांना नाईलाजास्तव हा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे तातडीने करुन एस. टी. बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)