शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

रूग्णांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: September 13, 2014 23:27 IST

दोडामार्गातील भयावह स्थिती : वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी

शिरीष नाईक, कसई दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामधील प्रभारी डॉ. के. व्ही. राव आजारी असून अन्य तीन डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास बसावे लागत आहे. एकप्रकारे रुग्णांची परवड होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आजारी असल्याने पर्यायी दुसरा डॉक्टर द्या, अशी मागणी ओरोस मुख्यालय येथे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत डॉक्टर देण्यात आला नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णालयामध्ये घडत आहे. लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष याला जबाबदार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्ग चारमधील डॉक्टरची चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी कार्यरत असलेले स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. ए. ए. ऐवले यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते रजेवर आहेत. उर्वरित तीन डॉक्टरची पदे रिक्त आहेत. असे असताना तेथील कामकाज चालावे, म्हणून डॉ. राव यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते गेला एक महिना दिवसरात्र ड्युटी करीत आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली असून त्यांनाच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागले आहे. त्यामुळे दोन दिवस त्यांनी ओपीडी बघण्याचे काम बंद केले. मात्र, गंभीर घटना घडल्यास रुग्णाची गैरसोय होऊ न देता ते तपासणी करतात. मात्र, याचा परिणाम ओपीडीवर झाला आहे. याबाबतची माहिती ओरोस येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देऊन येथे नवीन डॉक्टर द्या, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. डॉक्टर पाठवतो, असे सांगण्यात येते. मात्र, डॉक्टर पाठविण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर उपस्थित नाही. रुग्णांची एकाबाजूने भली मोठी रांग लागली होती. केस पेपर काढण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याचे न सांगता डॉक्टर येणार आहेत, असे सांगून रुग्णांना ११.३० वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती पत्रकारांना मिळताच हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये रुग्ण होते, परंतु डॉक्टर नव्हते, असे आढळून आले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यावेळी फोनाफोनी करण्यात आली. यावेळी एक तासानंतर आजारी असलेले डॉ. राव यांना रुग्णालयात यावे लागले व ओपीडी तपासण्याचे काम करावे लागले. रूग्णालय असूनही नसल्यासारखेजिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निष्काळजी धोरणामुळे दोन दिवस रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रुग्णांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जबाबदार एकही डॉक्टर येथे नसल्याने रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालय असूनही नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.