शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राजन तेलींवर बोलणे म्हणजे वेळ वाया

By admin | Updated: December 28, 2015 01:05 IST

संजू परब : सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत टीका; दीपक केसरकरांनाही सल्ला

सावंतवाडी : राजन तेली हा विषय काँग्रेससाठी केव्हाच संपला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलून वेळ वाया घालविणार नाही. त्यांचा स्वत:च्या पक्षावरच विश्वास उरला नाही, ते नारायण राणेंना काय तत्त्वज्ञान शिकवणार, अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली. ते सावंतवाडीत येथे पत्रकारांशी बोलत होते.यावेळी प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, निगुडे सरपंच झेवियर फर्नांडिस, नूतन शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, गुरू वारंग, संतोष जोईल, अरुण भिसे, दिलीप भालेकर, आदी उपस्थित होते.संजू परब म्हणाले, अकार्यक्षम पालकमंत्री ठरल्यानेच त्यांच्या मित्रपक्षातीलच लोक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. पालकमंत्री देवगड मतदारसंघाला निधी दिल्याचे सांगत आहेत, पण आमदार नीतेश राणे यांनी स्वत:च्या हिमतीवर सरकारकडून निधी आणला असून, त्यासाठी त्यांना उपोषणही करावे लागले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. काँग्रेसच्या काळात पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांचा बिमोड केला होता. मात्र, केसरकर यांचे प्रशासनातील अधिकारी कोण ऐकत नाही. त्यामुळेच हे धंदे फोफावले असून काँग्रेस योग्य आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी परब यांनी दिला आहे. आम्हाला पालकमंत्र्यांवर टीका करण्यात कोणताही रस नाही. मात्र, जनतेच्या हिताचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठीची आमची बांधीलकी असून ती कायम राहाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राजन तेली यांना स्वत:ची जेटी करता आली नाही. त्यांनी नारायण राणे यांच्यावर का टीका करावी? ज्या पक्षात तेली आहेत, त्याच पक्षावर त्यांचा विश्वास उरला नाही. त्यामुळेच ते प्रशासनावर टीका करीत असून, आमच्यासाठी तेली हा विषय संपल्याने यापुढे त्यांच्यावर टीका करणार नाही, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)युवक काँग्रेसची सावंतवाडीत आज बैठकराजापूर लोकसभा मतदारसंघातील युवक पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी येथील माजी खासदार कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला ‘युवक’चे नेते हिम्मत सिंग तसेच सरचिटणीस नंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.