शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचे समाधान

By admin | Updated: December 26, 2014 23:52 IST

विनोद गोसावी : कुडाळात गोसावी समाजबांधवांचा मेळावा

चौके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी वाढ समाधानकारक आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाज मंडळापुढील आव्हाने वाढली आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या पुढेही नवीन काही करावं लागेल, असे प्रतिपादन नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले. सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धन मंडळाचा जिल्हास्तरीय समाजबांधव मेळावा कुडाळ नाथबांधवांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोसावी बोलत होते.यावेळी नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या अध्यक्षा उर्मिला गोसावी, उपाध्यक्ष शरद गोसावी, मुंबई मंडळाचे सचिव अमरदीप गोसावी, योगेश गोसावी, भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते. विनोद गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. गोसावी म्हणाले, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव सत्कार झालेल्या गुणवंतांना झाली पाहिजे. संघटित समाज शेवटपर्यंत आपल्या नाथ बांधवांसाठी झगडणारा असला पाहिजे. आपल्या सर्वांना मिळून समस्यामुक्त समाज बनवायचा आहे. त्यासाठी आपापसात समन्वय साधून नाथ बांधवांसाठी आरोग्य शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन, वधु-वर मेळावा यांसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मुंबई मंडळ समाजाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वत:च्या समाजमंदिराचा संकल्प असून त्यासाठी जिल्ह्यातील नाथबांधवांनी जागा उपलब्ध करून द्यावी. मुंबई मंडळ इमारत निधी जमा करील, असे ते म्हणाले. मंडळाचे उपाध्यक्ष शरद गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विनोद गोसावी व उर्मिला गोसावी यांच्या हस्ते नाथसमाजातील चाफेखोल येथील आरोग्य पर्यवेक्षक जनार्दन गोसावी, म्हापण येथील संगीत विशारद गिरीश गोसावी, राज्यस्तरीय क्रीडापटू जीवन गोसावी, विठ्ठल गोसावी, रमाकांत गोसावी, अमरनाथ गोसावी, विठ्ठल गोसावी, कृष्णा गोसावी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सन २०१३-१४ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन झिलू गोसावी व प्रास्ताविक भालचंद्र गोसावी यांनी केले. शरद गोसावी यांनी आभार मानले. (वार्ताहर)