शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचे समाधान

By admin | Updated: December 26, 2014 23:52 IST

विनोद गोसावी : कुडाळात गोसावी समाजबांधवांचा मेळावा

चौके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी वाढ समाधानकारक आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाज मंडळापुढील आव्हाने वाढली आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या पुढेही नवीन काही करावं लागेल, असे प्रतिपादन नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले. सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धन मंडळाचा जिल्हास्तरीय समाजबांधव मेळावा कुडाळ नाथबांधवांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोसावी बोलत होते.यावेळी नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या अध्यक्षा उर्मिला गोसावी, उपाध्यक्ष शरद गोसावी, मुंबई मंडळाचे सचिव अमरदीप गोसावी, योगेश गोसावी, भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते. विनोद गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. गोसावी म्हणाले, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव सत्कार झालेल्या गुणवंतांना झाली पाहिजे. संघटित समाज शेवटपर्यंत आपल्या नाथ बांधवांसाठी झगडणारा असला पाहिजे. आपल्या सर्वांना मिळून समस्यामुक्त समाज बनवायचा आहे. त्यासाठी आपापसात समन्वय साधून नाथ बांधवांसाठी आरोग्य शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन, वधु-वर मेळावा यांसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मुंबई मंडळ समाजाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वत:च्या समाजमंदिराचा संकल्प असून त्यासाठी जिल्ह्यातील नाथबांधवांनी जागा उपलब्ध करून द्यावी. मुंबई मंडळ इमारत निधी जमा करील, असे ते म्हणाले. मंडळाचे उपाध्यक्ष शरद गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विनोद गोसावी व उर्मिला गोसावी यांच्या हस्ते नाथसमाजातील चाफेखोल येथील आरोग्य पर्यवेक्षक जनार्दन गोसावी, म्हापण येथील संगीत विशारद गिरीश गोसावी, राज्यस्तरीय क्रीडापटू जीवन गोसावी, विठ्ठल गोसावी, रमाकांत गोसावी, अमरनाथ गोसावी, विठ्ठल गोसावी, कृष्णा गोसावी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सन २०१३-१४ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन झिलू गोसावी व प्रास्ताविक भालचंद्र गोसावी यांनी केले. शरद गोसावी यांनी आभार मानले. (वार्ताहर)