शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

....तर जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळा होणार बंद?

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ

रहिम दलाल - रत्नागिरी  विद्यार्थीसंख्या १० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी ती शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. ग्रामीण भागातही खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.तसेच नोकरी, धंद्यानिमित्त लोक शहराकडे धाव घेत असतानाच लोकसंख्येचे होणारे कमी प्रमाण, अशी विविध कारणे पटसंख्या कमी होण्यामागे आहेत. तरीही जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जाचाही विचार केला जात आहे. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ शाळा आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होतील.नवीन शाळा, तुकड्या सुरु करणे, मंजूर करणे व त्या टिकविणेबाबतचे निकष ठरविण्याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १ ते १० विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.प्रधान सचिवांच्या या शिफारशींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्या असलेल्या ४७४ शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. त्या शाळांमधील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल. तसेच २६ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ ते ८वीपर्यंतच्या शाळाही बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये २५६२ मराठी माध्यम आणि १७१ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास उर्दूच्या निम्म्यापेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्यानंतर या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन कोठे करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.