शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

....तर जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळा होणार बंद?

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ

रहिम दलाल - रत्नागिरी  विद्यार्थीसंख्या १० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी ती शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. ग्रामीण भागातही खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.तसेच नोकरी, धंद्यानिमित्त लोक शहराकडे धाव घेत असतानाच लोकसंख्येचे होणारे कमी प्रमाण, अशी विविध कारणे पटसंख्या कमी होण्यामागे आहेत. तरीही जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जाचाही विचार केला जात आहे. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ शाळा आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होतील.नवीन शाळा, तुकड्या सुरु करणे, मंजूर करणे व त्या टिकविणेबाबतचे निकष ठरविण्याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १ ते १० विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.प्रधान सचिवांच्या या शिफारशींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्या असलेल्या ४७४ शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. त्या शाळांमधील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल. तसेच २६ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ ते ८वीपर्यंतच्या शाळाही बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये २५६२ मराठी माध्यम आणि १७१ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास उर्दूच्या निम्म्यापेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्यानंतर या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन कोठे करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.