शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

....तर जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळा होणार बंद?

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ

रहिम दलाल - रत्नागिरी  विद्यार्थीसंख्या १० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी ती शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. ग्रामीण भागातही खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.तसेच नोकरी, धंद्यानिमित्त लोक शहराकडे धाव घेत असतानाच लोकसंख्येचे होणारे कमी प्रमाण, अशी विविध कारणे पटसंख्या कमी होण्यामागे आहेत. तरीही जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जाचाही विचार केला जात आहे. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ शाळा आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होतील.नवीन शाळा, तुकड्या सुरु करणे, मंजूर करणे व त्या टिकविणेबाबतचे निकष ठरविण्याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १ ते १० विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.प्रधान सचिवांच्या या शिफारशींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्या असलेल्या ४७४ शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. त्या शाळांमधील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल. तसेच २६ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ ते ८वीपर्यंतच्या शाळाही बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये २५६२ मराठी माध्यम आणि १७१ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास उर्दूच्या निम्म्यापेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्यानंतर या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन कोठे करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.