शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्गची लोकसंख्या सर्वांत कमी

By admin | Updated: July 10, 2015 22:02 IST

कुटुंब नियोजनामुळे घट : जिल्ह्यातील जनतेचे रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर

रजनीकांत कदम -कुडाळ -सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या कमी झाली असून, ती कमी होण्याच्या कुटुंब नियोजनाच्या कारणाबरोबरच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता रोजगारासाठी स्थलांतर होत आहे, हेही लोकसंख्या कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे मत जाणकार व शासनाचे अधिकारी यांचे आहे. निसर्गसंपन्न, साक्षरता, विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्तींची खाण असलेला व देशातील पहिला पर्यटन जिल्हा अशी अनेक बिरूदावली मिरविणारा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून २०११च्या जनगणनेनुसार ठरल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब भूषणावह या जनगणनेनुसार भारतात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक लागत आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २४ लाखांच्या वर पोहोचली असून, ती सुमारे १६ टक्केच्या सरासरीने वाढतच आहे. राज्यात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. वरील २००१ व २०११ च्या आकडेवारी वरून असे लक्षात येते की, जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली नसून ती कमी झाली आहे. ही लोकसंख्या कमी होण्याची टक्केवारी ही वजा २.३० टक्के एवढी आहे. कामगार न मिळाल्याने एमआयडीसीतील काही कंपन्या बंद झाल्या आहेत. लघुउद्योग, कारखाने सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. शासनाच्या सर्व योजनांना येथील जनता भरभरून प्रतिसाद देते, असे असतानाही कमी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यातील जनतेला प्रशासन सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. भूषणावह असले तरी विचार कराएकीकडे जगासमोर वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासूराचे संकट आ वासून उभे असताना जिल्ह्याची लोकसंख्या कमी असणे हे भूषणावह असले तरी लोकसंख्या का कमी होत आहे, याचा विचार करणेही गरजेचे आहे. शासनाच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यातील सुशिक्षित जनता ही रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात आहे. हे जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे. कारण काही गावांमध्ये ज्येष्ठच मंडळी आढळतात. लोकसंख्या कमी होण्यामागची कारणे सुशिक्षितांचा जिल्हा, स्त्री-पुरुष समानता मानली जाते, कुटुंब नियोजनाचे पालन, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम माहीत आहेत, जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रमांचे आयोजन गावागावांत असते. एक किंवा दोन मुलांवर समाधान मानने, रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर अशी विविध कारणे आहेत. विद्यार्थ्याविना शाळा पडताहेत ओसआपली मुले चांगले शिक्षण घ्यावीत, याकरिता बहुतांश पालक हे मुलांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवितात. यामुळे जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमधील पटसंख्या घटत असताना कमी जनन दर असल्याने मुले कमी प्रमाणात आढळल्याने सरकारी शाळा विद्यार्थ्याविना ओस पडत आहेत.या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथील मोठ्या प्रमाणात जनताही रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन तिथेच राहत असल्याने जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण कमी असण्यामागे रोजगारासाठी स्थलांतर हे महत्त्वाचे कारण आहे, असे मत जिल्हा सांख्यिकी विभागाचे अधिकारी मसगे यांनी व्यक्त केले.स्त्रियांचे प्रमाण जास्त मुलींचे कमी होणारे प्रमाण पाहता सगळीकडे ‘बेटी बचाव, राष्ट्र बचाव’ मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील पुरुष व महिला यांच्या लोकसंख्येची आकडेवारी पाहता हे चिभ येथे वेगळे असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त आहे. सरासरी १000 पुरुषांच्या मागे १0३७ स्त्रिया एवढे प्रमाण आहे.