शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्गचा सर्वांगिण विकास -  केसरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 20:15 IST

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला. 

सिंधुदुर्गनगरी दि. 15 - कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.  भारतीय स्वातंत्रयदिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्यजारोहण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरण व्हावे, पर्यटन विकासाला चालना मिळावी, पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास व्हावा, श्री भात पध्दतीचा विस्तार होऊन भात शेती किफायतशीर व्हावी या अनुषंगाने चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना सिंधुदुर्गात राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन केसरकर  म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करुन आर्थिक जीवनमान उंचावल्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटन व सिंधुदुर्ग यांच नांत अधिक दृढ आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात प्रगतीचा चढता आलेख ठेवला आहे.  सिंधुदुर्गातील शेतकरी पारंपरिक भात शेतीला फाटा देऊन आता श्री पध्दतीने भात लागवड करण्याकडे मोठ्‌या प्रमाणात आकर्षित झाला आहे. गतवर्षी श्री पध्दतीने भात लागवडीचे एक हजार हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात होते. यंदाच्या वर्षी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड झाली असल्याचे सांगून केसरकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात फळझाड लागवडीचं प्रमाण अत्यल्प होत. तथापि जिल्हा प्रशासन, कृषी व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाव्दारे यंदाच्या वर्षी आठ हजार 500 हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवड होत आहे.   कृषी सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षात सिंधुदर्गात 16 हजार 375 वनराई / कच्चे बंधारे धडक कार्यक्रमाव्दारे बांधण्यात आल्याचे सांगुन पालकमंत्री म्हणाले की, कोल्हापूर पध्दतीच्या 29 बंधा-याची कामे पुर्ण करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील 308 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली. स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा तसेच या महिन्यात येणा-या गणशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.   मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास आमदार वैभव नाईक, प्रभाकर सावंत जिल्हास्तरीय अधिकारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होती. ल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते सकाळी ठीक 08.30 वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.