शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सिंधुदुर्गवासियांना टोल माफी मिळालीच पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:21 IST

या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी ; प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवलीत टोल माफी कृती समितीची स्थापना; सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण होताना ओसरगाव येथे टोल नाका उभारणी करण्यात आली आहे.  या टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व वाहनांना टोल माफी मिळावी़ .त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये टोल मुक्तीचे ठराव घेण्यात यावेत. असे ठरविण्यात आले. तर सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे टोलमाफी मिळण्यासंदर्भात टोलमुक्ती कृती समितीच्यावतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टोलमुक्ती कृती समितीही या बैठकीत स्थापन करण्यात आली . या समितीच्या निमंत्रकपदी अशोक करंबळेकर, बाळू मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

      कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे टोल माफी संदर्भात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अशोक करंबळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, डॉ. विद्याधर तायशेटे, बाळू मेस्त्री, संजय मालंडकर, राजस रेगे, मनोहर पालयेकर, राजेश सावंत, हनिफ पिरखान, भाई जेठे, बाळकृष्ण बावकर, सचिन सादये, महानंद चव्हाण, श्रीकांत तेली, दयानंद उबाळे, नितीनकुमार पटेल, संजय राणे, गणेश राणे, परेश परुळेकर, अमित आवटे, हरिष गणपत्ये, विजय मसुरकर, विशाल हर्णे, मारूती वरवडेकर, हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, सुशांत दळवी, ज्ञानेश पाताडे, गौरव हर्णे आदींसह नागरीक, वाहनधारक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

        या बैठकीत अशोक करंबळेकर यांनी रस्ते विकास करताना तो शासनाने खाजगी विकासकामार्फत भागीदारीत केलेला आहे़ त्यामुळे टोल कर स्वरूपात गोळा केला जाणार आहे. मात्र , त्या टोलच्या पाच किलोमिटरच्या अंतरातील नागरीकांच्या वाहनांना टोलमाफी मिळेल़. लवकरच टोल सुरू होणार आहे़ . त्यामुळे आपल्याला वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल़ . तसेच बाळू मेस्त्री यांनी ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत या ठिकाणी टोलमाफी मिळावी.  या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़.

टोल माफी कृती समिती गठीत!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन धारकांना टोल माफीतून दिलासा देण्याच्या दृष्टीने कणकवली येथे टोल माफी कृती समिती गठीत करण्यात आली़  आहे. त्यामध्ये  निमंत्रक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबळेकर, बाळू मेस्त्री, विशाल कामत, संजय राणे, अ‍ॅड़ मनोज रावराणे, सुशांत दळवी आदींचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :konkanकोकणtollplazaटोलनाका