शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंधुदुर्गात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : केसरकर

By admin | Updated: June 26, 2017 19:08 IST

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २६ : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्राविण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १0९ शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरु करण्यात यईल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.मार्च २0१७ मध्ये झालेल्या दहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थी, १00 टक्के निकाल लावणा-या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व संस्था चालकांचा गौरव सोहळयात पालकमंत्री केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, खोबरेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मातोंडकर, सचिव कुसगावकर, संस्था संचालक प्रतिनिधी आत्माराम राऊळ, दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षणावर राज्याच्या बजेटच्या २५ टक्के म्हणजे ४५ हजार कोटी रुपये खर्च करणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शिक्षण संस्थांचा कारभार आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे कष्ट व जिल्ह्यांच्या समन्वयाने शिक्षण तंत्रात सिंधुदुर्ग अग्रेसर आहे. स्पर्धा परीक्षा बाबत कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे या बाबत विद्यार्थी-शिक्षकांनी विधायक सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांचा केसरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी दहावी परीक्षेत १00 टक्के गुण मिळविणा-या बारा विद्यार्थी तसेच दहावी व बारावी परीक्षेत १00 टक्के निकाल लावणा-या २७ शाळा तसेच दहावी परीक्षेत १00 टक्के निकाल लावणा-या १0९ शाळांचा गौरव करण्यात आला.प्रारंभी शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तन्वी संतोष कदम, रोहित गंगाराम कोकरे यांनी सत्काराला उत्तर देताना उच्च शिक्षणातही असेच यश कायम राखू अशी ग्वाही दिली. आभार प्रदर्शन निरोप अजय पाटील यांनी केले.