शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:47 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर बुधवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याची डागडुजी तत्काळ करण्याची मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या पार्श्वभूमीवर जानवली नदीपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यात चिखल तयार झाला असून संपूर्ण रस्ताच जणू चिखलमय झाला आहे. या चिखलामुळे विद्यार्थ्यांसह वाहनचालक तसेच पादचारी त्रस्त झाले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, स्वरूपा विखाळे, दामोदर सावंत, राजू राठोड, रामदास विखाळे, मिलिंद केळुसकर, रिमेश चव्हाण, अ‍ॅड. हर्षद गावडे, स्वप्नील चिंदरकर यांच्यासह जानवली, कलमठ, तरंदळे येथील ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. तसेच वाहतूक कोंडीही झाली होती.यादरम्यान जानवली नदीपुलाचे काम करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? दिलीप बिल्डकॉन की केसीसी बिल्डकॉनची? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जानवली पुलाची जबाबदारी आमची नसल्याचे दिलीप बिल्डकॉनचे गौतमकुमार यांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पुलाच्या दुरुस्तीवरून महामार्ग ठेकेदारांची काहीकाळ टोलवाटोलवी सुरु होती.

कणकवली शहरालगत जानवली नदीपुलावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

दोन तास होऊनही ठेकेदार अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, आक्रमक ग्रामस्थांनी अधिकारी आणि ठेकेदार येईपर्यंत हा रास्तारोको सुरू राहणार असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षकांनी आंदोलन मागे घ्या. अधिकारी अर्ध्या तासात येतील असे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी २० आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले....अन्यथा कायदेशीर कारवाई करूरास्तारोको आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खड्डे तत्काळ बुजविण्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, रास्ता रोकोनंतर तीन तास विलंबाने येणाऱ्या उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी धारेवर धरले. यापुढे आंदोलकांना त्वरित सामोरे जा, अन्यथा, फौजदारी कारवाई करू, असा इशारा शिवाजी कोळी यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Chakka jamचक्काजामsindhudurgसिंधुदुर्ग