शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:47 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर बुधवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याची डागडुजी तत्काळ करण्याची मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या पार्श्वभूमीवर जानवली नदीपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यात चिखल तयार झाला असून संपूर्ण रस्ताच जणू चिखलमय झाला आहे. या चिखलामुळे विद्यार्थ्यांसह वाहनचालक तसेच पादचारी त्रस्त झाले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, स्वरूपा विखाळे, दामोदर सावंत, राजू राठोड, रामदास विखाळे, मिलिंद केळुसकर, रिमेश चव्हाण, अ‍ॅड. हर्षद गावडे, स्वप्नील चिंदरकर यांच्यासह जानवली, कलमठ, तरंदळे येथील ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. तसेच वाहतूक कोंडीही झाली होती.यादरम्यान जानवली नदीपुलाचे काम करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? दिलीप बिल्डकॉन की केसीसी बिल्डकॉनची? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जानवली पुलाची जबाबदारी आमची नसल्याचे दिलीप बिल्डकॉनचे गौतमकुमार यांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पुलाच्या दुरुस्तीवरून महामार्ग ठेकेदारांची काहीकाळ टोलवाटोलवी सुरु होती.

कणकवली शहरालगत जानवली नदीपुलावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

दोन तास होऊनही ठेकेदार अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, आक्रमक ग्रामस्थांनी अधिकारी आणि ठेकेदार येईपर्यंत हा रास्तारोको सुरू राहणार असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षकांनी आंदोलन मागे घ्या. अधिकारी अर्ध्या तासात येतील असे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी २० आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले....अन्यथा कायदेशीर कारवाई करूरास्तारोको आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खड्डे तत्काळ बुजविण्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, रास्ता रोकोनंतर तीन तास विलंबाने येणाऱ्या उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी धारेवर धरले. यापुढे आंदोलकांना त्वरित सामोरे जा, अन्यथा, फौजदारी कारवाई करू, असा इशारा शिवाजी कोळी यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Chakka jamचक्काजामsindhudurgसिंधुदुर्ग