शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सिंधुदुर्ग : तारामुंबरी नस्त भाग नौकांकरिता धोकादायक, मच्छिमार बांधवांची मागणी : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:19 IST

तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देतारामुंबरी नस्त भाग नौकांकरिता धोकादायक, मच्छिमार बांधवांची मागणी : नीतेश राणेमत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

देवगड : तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी खास बैठकीचे आयोजन तारामुंबरी येथे केले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय खात्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आर. आर. महाडीक, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, ताम्हणकर, तारामुंबरी मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

या चर्चेत प्रामुख्याने तारामुंबरी नस्त हा भाग मच्छिमारी नौकांना धोकादायक झाला असून यापूर्वीही छोट्या मोठ्या मच्छिमारी नौकांना या भागात अपघात झाले आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत असून या भागातील खडके व गाळ उपसण्यात यावा व या बंदराचा योग्य तो आराखडा बनविण्यात येऊन तारामुंबरी नस्त भाग सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी उपस्थितांनी केली.या अनुषंगाने संबंधित खात्याच्या अधिकाºयांकडे आवश्यक तो आराखडा स्थानिक मच्छिमारांनी मांडून त्या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी याकरिता आवश्यक त्या निधीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.तसेच परप्रांतीय हायस्पीड नौकांच्या घुसखोरीबाबत ठोस कारवाई मत्स्य व्यवसाय खात्यामार्फ त करण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर मांडली. त्यावेळी अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधनसामुग्री यामुळे ठोस कारवाई करणे शक्य होत नाही. तरीही आतापर्यंत ३५ हून अधिक नौकांवर कारवाई केल्याच सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी नमूद केले.यासंदर्भात मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत आगामी काळात परप्रांतीय हायस्पीड नौकांवर कारवाई करणे अशक्य होत असेल तर तसा अहवाल पोलीस प्रशासनाकडे द्यावा.

जेणेकरून या परप्रांतीय नौकांवर कारवाईसाठी स्थानिक आक्रमक झाल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनामार्फत होणार नाही याची खबरदारी मत्स्य व्यवसाय खात्याने घ्यावी, असेही आमदार राणे यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग