शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

सिंधुदुर्गात आठ टक्केच शेतकरी थकबाकीदार

By admin | Updated: June 12, 2017 23:28 IST

सिंधुदुर्गात आठ टक्केच शेतकरी थकबाकीदार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २0१६ मध्ये सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना विविध बँकेमार्फत २0७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. पैकी कर्ज वाटपात एकट्या जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळेस जिल्हा बँकेमार्फत ११0 कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले होते. यातील तब्बल ९२ टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे, तर उर्वरित ८ टक्के शेतकऱ्यांची वसुली सुरू आहे. जिल्ह्यात पीक कर्ज परतफेडीचे प्रमाण समाधानकारक आहेत. त्यामुळे शासनाने अल्पभूधारकांना जाहीर केलेल्या कर्ज माफीचा योग्य असा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज दिले जाते. यात मोठे शेतकरी, अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारकांना शेतीसाठी कर्ज दिले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना ११0 कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून )देण्यात आले होते. जिल्"ातील शेतकरी हा मेहनती असून आपली समाजातील पत संभाळणारा आहे. शेतकरी हा प्रमाणिकपणे आपले पीक कर्ज फेडत असतो. सिंधुदुर्ग जिल्"ात मोठ्या प्रमाणात पिक कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परत फेड ही वेळीच केली जाते. सन २0१६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत जिल्"ातील सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना ११0 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यापैकी सुमारे ९२ टक्के शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली आहे. ८ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहे. परंतु ते ही वसूल होणार आहे. त्यामुळे शासनाने जाहिर केलेल्या अल्पभूधारक व गरजू शेतक-यांना कर्ज माफी चा फायदा मात्र येथील शेतक-यांना होणार नाही. झालाच तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या शेतक-यांना होण्याची शक्यता आहे. २३८ कोटी ६५ लाखाचे कर्ज वाटपचे उद्दिष्ट २०१६ मध्ये जिल्"ातील ३९ हजार ७८८ शेतकऱ्यांना २०६ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक १०१ कोटी ५० लाख, राष्ट्रीयकृत बँका ९४ कोटी ९७ लाख, ग्रामीण बँक १७ कोटी यांचा समावेश होता. २०१७ साठी २३८ कोटी ६५ लाख रूपयांचे संभाव्य पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँक ९८ कोटी, राष्टीयकृत बँक ११९ कोटी ७५ लाख, ग्रामीण बँक ११ कोटी २० लाख तर इतर बँका ९ कोटी ७० लाख यांचा समावेश आहे. प्रतिक्रिया...९२ टक्के कर्ज भरणाऱ्यांना प्रौत्साहनपर अनुदान मिळावेशासनाचा कर्ज माफी बाबतचा जीआर नाही. केवळ मंत्री व सुकाणू समिती यांच्यामध्ये निर्णय झाला आहे. स्वत:ची समाजातील पत सांभाळण्यासाठी येथील शेतकरी कोठूनही कर्ज भरतो. त्यामुळे जिल्"ातील थकित ८ टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफी करतानाच ९२ टक्के प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून करणार. प्रमाणिकपणे कर्ज भरणाऱ्या ९२ टक्के शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठी आंदोलन करणार.-सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष- सिंधुदुर्ग