शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:12 IST

कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे सावंतवाडी येथील धार्मिक दहशतवाद, असहिष्णुता विरोधी परिषदेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात दहशत व अराजकता निर्माण करू पाहणार्‍या शक्तींना कायमचा पायबंद घालण्याची वेळ आली आहे, असा विचार उपस्थितांनी व्यक्त केला. या परिषदेला कॉ. संपत देसाई, सत्यशोधक आंदोलनाचे अंकुश कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद मेणसे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, महेश परुळेकर, संजय वेतुरेकर, लीलाधर घाडी आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, राजकीय क्षेत्रात हुकूमशाही आली की कष्टकरी जनतेला अच्छे दिन कसे येतील? आज वाढते पेट्रोल दर व अन्य समस्या भेडसावत आहेत. हत्या होत आहेत. मात्र, अशा विषयांवर देशभ्रमंती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांना ब्र देखील का काढता येत नाही? हेच का त्यांचे अच्छे दिन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.संपत देसाई म्हणाले, दहशत माजवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होण्याचे हे दिवस भयानक आहेत. यासाठी सर्वांनी एक होऊन लढा दिला पाहिजे. अन्यथा ही दहशत वाढतच जाईल. नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सावंतवाडी सुसंस्कृत शहर आहे. येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनासाठी गोविंद पानसरे या नगरीत आले होते. त्यावेळच्या व अन्य चळवळीत सहभाग असलेल्या लेखकाच्या पाठीशी सर्वांनी रहायला हवे. कारण एकजूट असेल तरच असे प्रकार रोखता येतील.

अंकुश कदम यांनी धर्माच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते घातक असून आज लेखक, कवी यांच्यावर हल्ले होत आहेत. हे आपल्या देशाला भूषणावह नाही. राज्यकर्त्यांनी त्यांना संरक्षण द्यायला हवे, असे मत व्यक्त केले.यावेळी संजय वेतुरेकर, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. गोविंद काजरेकर, वीरधवल परब, राजेश मोंडकर, लीलाधार घाडी यांनी मनोगत मांडले. यावेळी रमेश बोंदे्र, बाळ बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, शशी नेवगी, नितीन वाळके, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रभाकर भागवत, प्रा. विजय फातर्पेकर, विठ्ठल कदम, अमोल कदम, राजेंद्र्र कांबळे, प्रकाश तेंडोलकर, आनंद परुळेकर, मधुकर मातोंडकर, प्रज्ञाकुमार गाथाडे, जयंत बरेगार, सिद्धार्थ तांबे, विजय ठाकर, महेश पेडणेकर, रवींद्र्र संकपाळ, रामदास जाधव, अनिल सरमळकर, प्रा. रुपेश पाटील, शिवाजी वांद्र्रे, योगेश संकपाळ, उषा परब, अ‍ॅड. प्रकाश परब, डॉ. शरयू आसोलकर, अनिता सडवेलकर, महाश्वेता कुबल, समीर बेग उपस्थित होते.

यावेळी मारेकर्‍याच्या हिटलिस्टवर असणार्‍या साहित्यिकाच्या मनोगताचे वाचन नंदू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परुळेकर, प्रास्ताविक अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी केले. हा धार्मिक दहशतवाद राज्यकर्त्यांच्या हुकूमशाहीमुळे चालला आहे. हा दहशतवाद निर्माण करू पाहत आहे. अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी लढा द्यायला हवा, असा निर्णय घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन दिले.हिटलिस्टवर असलेल्या लेखकाचे मनोगतहिटलिस्टवर असलेल्या लेखक प्राध्यापकाने आपले मनोगत परिषदेत पाठविले होते. त्याचे वाचन नंदू पाटील यांनी केले. लेखकाने म्हटले आहे की, लेखकाला हवे ते लिहिता येऊ नये असा हा काळ आहे. या काळात आपल्यातल्या एखाद्या लेखकाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो. सर्व जण सैरभैर होतात, मुळात विखुरलेले असलेले सबबी सांगत आणखी दूर जातात. ही गोष्ट आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला साजेशीच आहे. पण या अशा वेळीच आपली वैचारिकता, भूमिकेतील ठामपणा, मानसिक कणखरपणा यांची कसोटी लागत असते.

मराठी लेखक अन्य भाषिक लेखकांच्या तुलनेत या बाबतीत कमी पडतो, हे आणीबाणीसह अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे. एखादा दुर्गा भागवतांसारखा अपवाद वगळता बहुसंख्य लेखकांनी आपल्या सुरक्षित कवचात राहणे पसंत केले आहे. पु. ल. देशपांडे, दळवी, आ. ना. पेडणेकर, तुलशी परब, नेमाडे, जयंत पवार अशांनी भाषण वा प्रासंगिक लेखन यामधून सडेतोड भूमिका घेतली आहे. आज या गोष्टींचीच गरज आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी