शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:12 IST

कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे सावंतवाडी येथील धार्मिक दहशतवाद, असहिष्णुता विरोधी परिषदेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात दहशत व अराजकता निर्माण करू पाहणार्‍या शक्तींना कायमचा पायबंद घालण्याची वेळ आली आहे, असा विचार उपस्थितांनी व्यक्त केला. या परिषदेला कॉ. संपत देसाई, सत्यशोधक आंदोलनाचे अंकुश कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद मेणसे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, महेश परुळेकर, संजय वेतुरेकर, लीलाधर घाडी आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, राजकीय क्षेत्रात हुकूमशाही आली की कष्टकरी जनतेला अच्छे दिन कसे येतील? आज वाढते पेट्रोल दर व अन्य समस्या भेडसावत आहेत. हत्या होत आहेत. मात्र, अशा विषयांवर देशभ्रमंती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांना ब्र देखील का काढता येत नाही? हेच का त्यांचे अच्छे दिन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.संपत देसाई म्हणाले, दहशत माजवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होण्याचे हे दिवस भयानक आहेत. यासाठी सर्वांनी एक होऊन लढा दिला पाहिजे. अन्यथा ही दहशत वाढतच जाईल. नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सावंतवाडी सुसंस्कृत शहर आहे. येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनासाठी गोविंद पानसरे या नगरीत आले होते. त्यावेळच्या व अन्य चळवळीत सहभाग असलेल्या लेखकाच्या पाठीशी सर्वांनी रहायला हवे. कारण एकजूट असेल तरच असे प्रकार रोखता येतील.

अंकुश कदम यांनी धर्माच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते घातक असून आज लेखक, कवी यांच्यावर हल्ले होत आहेत. हे आपल्या देशाला भूषणावह नाही. राज्यकर्त्यांनी त्यांना संरक्षण द्यायला हवे, असे मत व्यक्त केले.यावेळी संजय वेतुरेकर, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. गोविंद काजरेकर, वीरधवल परब, राजेश मोंडकर, लीलाधार घाडी यांनी मनोगत मांडले. यावेळी रमेश बोंदे्र, बाळ बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, शशी नेवगी, नितीन वाळके, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रभाकर भागवत, प्रा. विजय फातर्पेकर, विठ्ठल कदम, अमोल कदम, राजेंद्र्र कांबळे, प्रकाश तेंडोलकर, आनंद परुळेकर, मधुकर मातोंडकर, प्रज्ञाकुमार गाथाडे, जयंत बरेगार, सिद्धार्थ तांबे, विजय ठाकर, महेश पेडणेकर, रवींद्र्र संकपाळ, रामदास जाधव, अनिल सरमळकर, प्रा. रुपेश पाटील, शिवाजी वांद्र्रे, योगेश संकपाळ, उषा परब, अ‍ॅड. प्रकाश परब, डॉ. शरयू आसोलकर, अनिता सडवेलकर, महाश्वेता कुबल, समीर बेग उपस्थित होते.

यावेळी मारेकर्‍याच्या हिटलिस्टवर असणार्‍या साहित्यिकाच्या मनोगताचे वाचन नंदू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परुळेकर, प्रास्ताविक अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी केले. हा धार्मिक दहशतवाद राज्यकर्त्यांच्या हुकूमशाहीमुळे चालला आहे. हा दहशतवाद निर्माण करू पाहत आहे. अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी लढा द्यायला हवा, असा निर्णय घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन दिले.हिटलिस्टवर असलेल्या लेखकाचे मनोगतहिटलिस्टवर असलेल्या लेखक प्राध्यापकाने आपले मनोगत परिषदेत पाठविले होते. त्याचे वाचन नंदू पाटील यांनी केले. लेखकाने म्हटले आहे की, लेखकाला हवे ते लिहिता येऊ नये असा हा काळ आहे. या काळात आपल्यातल्या एखाद्या लेखकाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो. सर्व जण सैरभैर होतात, मुळात विखुरलेले असलेले सबबी सांगत आणखी दूर जातात. ही गोष्ट आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला साजेशीच आहे. पण या अशा वेळीच आपली वैचारिकता, भूमिकेतील ठामपणा, मानसिक कणखरपणा यांची कसोटी लागत असते.

मराठी लेखक अन्य भाषिक लेखकांच्या तुलनेत या बाबतीत कमी पडतो, हे आणीबाणीसह अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे. एखादा दुर्गा भागवतांसारखा अपवाद वगळता बहुसंख्य लेखकांनी आपल्या सुरक्षित कवचात राहणे पसंत केले आहे. पु. ल. देशपांडे, दळवी, आ. ना. पेडणेकर, तुलशी परब, नेमाडे, जयंत पवार अशांनी भाषण वा प्रासंगिक लेखन यामधून सडेतोड भूमिका घेतली आहे. आज या गोष्टींचीच गरज आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी