शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सिंधुदुर्ग : देशातील माल वाहतूक २० जुलैला बंद, प्रकाश गवळी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:44 IST

गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आमच्या रास्त आणि न्याय्य मागण्यांपैकी एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी ६ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असून, यावेळी देशातील मालवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कमिटी मेंबर व महाराष्ट्र राज्य ट्रक, बस, मोटार वाहतूक महासंघाचे राज्यअध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदेशातील माल वाहतूक २० जुलैला बंद, प्रकाश गवळी यांची माहिती केंद्र सरकारकडून न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष

सिंधुदुर्ग : गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आमच्या रास्त आणि न्याय्य मागण्यांपैकी एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्यावतीने २० जुलै रोजी सकाळी ६ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असून, यावेळी देशातील मालवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कमिटी मेंबर व महाराष्ट्र राज्य ट्रक, बस, मोटार वाहतूक महासंघाचे राज्यअध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कुडाळ येथे आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा मोटार वाहतूक मालक-चालक संघटना यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गवळी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश केसरकर, राजेंद्र्र तार्इंगडे, शिवाजी घोगळे, गिरीधर रावराणे, राजन बोभाटे, बावतीस फर्नांडिस, शरद वालावलकर, मनोज वालावलकर, रामदास पडते, शेखर मुणगेकर, रघुराज वाटवे, विवेकानंद केरकर, पांडुरंग कांदळगावकर, विजय वालावलकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.गवळी म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात कोणत्याच मागण्यांचा विचार केला नसून माहितीही दिली नाही. सातत्याने मागणी करूनसुद्धा पूर्तता होत नसल्याने एआयएमटीसीच्या २०५ व्या व्यवस्थापन समिती बैठकीनुसार २० जुलैपासून राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय आल्याची माहिती त्यांनी दिली.सरकारच्या जुलमी आणि दबावजन्य वाहतूक विरोधी धोरणांमुळे मूलभूत प्रश्न आणि समस्या सोडविणे तर दूरच, पण या सर्व क्षेत्राला झुलवत ठेवले असून, या सर्व प्रकारांमुळे हा उद्योग संपण्याच्या मार्गावर आला आहे. हा व्यवसाय वाचवायचा असेल, तर काही महत्त्वाच्या बाबींवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यामध्ये असहनीय झालेली डिझेल दरवाढ कमी करावी, वर्षभराचा टोल एकदाच घ्यावा, त्यामुळे डिझेल व वेळेचे होणारे नुकसान वाचेल, वाहतूक व्यवसायाला टीडीएस आकारणी करू नये, १८ टक्के जीएसटी कमी करावा, अशा व इतर मागण्या आमच्या आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू राहील, असेही गवळी यांनी सांगितले.जीवनावश्यक वस्तू वाहतुकीस विरोध नाहीसंपकाळात जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला आम्ही विरोध करीत नाही. तरीही भाजीपाला तसेच इतर वस्तूंचा दर वाढविला जातो, असे सांगत आता वेळ पडल्यास ही वाहतूकही आम्ही बंद करणार आहोत, असे गवळी यांनी सांगितले.राज्यातील महामार्ग पोलीस विभागासह तालुका, शहर, ग्रामीण, अवैध वाहतूक विरोधी पथक या सर्व विभागांचे पोलीस वाहतूकदारांना अडवून त्यांची लूट करतात, असा आरोप गवळी यांनी पोलीस प्रशासनावर केला. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग