शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मराठा समाज निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना घरी बसविणार : सुरेश पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:26 IST

आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मराठा समाज घरी बसविणार असल्याची माहिती मराठा क्रान्ति मोर्चा समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली़.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांशी केली चर्चादसऱ्याच्या मुहुर्तावर पक्षाची होणार घोषणा

कणकवली : गेल्या २०-२५ वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या मराठा समाजातील नेत्यांनी अद्यापही समाजाला आरक्षण मिळवून दिलेले नाही. २०१६ मध्ये मराठा क्रांती मुक मोर्चातून आपल्या भावना समाजाने सरकार दरबारी पोहोचविल्या़ तरी देखील समाजाला आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईतील राज्यव्यापी समन्वय बैठकीत मराठा समाजाचा पक्ष काढण्याचा निर्णय झाला आहे.

या पक्षाची घोषणा रायरेश्वर मंदिरातून दसऱ्याच्या मुहुर्तावर करण्यात येईल़. त्यानंतर होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मराठा समाज घरी बसविणार असल्याची माहिती मराठा क्रान्ति मोर्चा समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली़.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एस़ टी़ सावंत, लवू वारंग, युवा उद्योजक गोपाळ दळवी, योगेश सावंत, भरत पाटील, कोल्हापूर कार्याध्यक्ष संतोष कांदेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर, युवा जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर, परेश भोसले आदींसह मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सुरेश पाटील म्हणाले, कोल्हापूर येथे १ हजार मराठा कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापनेसाठी अनुमोदन दिले आहे. जोपर्यंत या सत्ताधाऱ्यांना आणि पहिल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून बाजूला ठेवून मराठा समाज सत्तेवर येत नाही. तोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. मराठा समाजातील नेते गेले २५ वर्षे सत्तेत राहून समाजावर राजकारण करत आहेत.

त्या प्रस्थापितांना हरविण्यासाठी आमचा पक्ष काम करेल़. कोकणात काही नेत्यांनी नेतृत्व केले़ पण कोकणचा विकास झाला का? मुळ पायाभूत सुविधा आल्या आहेत का? कोकणचे कॅलीफोर्निया करण्याचे काम मराठा समाजाचा पक्ष करेल. त्या पक्षाच्या पाठीशी जिल्हा वासियांनी राहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, मराठा समाज पक्ष काढत असल्याचे समजल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी नाहक सोशल मिडीयावर बदनामी सुरू केली आहे़ . या बदनामीला मर्द मराठा घाबरणार नाही. आता लढाई आरपारची होईल़ मराठा समाज पक्षाच्या उमेदवारांमध्ये ५० टक्के महिलांना संधी असेल.

युवक-युवतींना प्राधान्य दिले जाईल़ शिक्षण, आरोग्य, संरक्षण, उद्योग, शेती, रोजगार क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांना सोबत घेऊन हा पक्ष काम करेल. या पक्षाला कोणीही अध्यक्ष असणार नाही. पक्षाचा उमेदवारीचा निर्णय १०० समन्वयकांच्या उपस्थितीत होईल़ मुख्य समन्वयक व जिल्ह्यामध्ये उपसमन्वयक काम करतील़ प्रस्थापितांना धक्का देऊन काम करणारा हा पक्ष असणार आहे.महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्वही जागा मराठा समाजाचा पक्ष लढेल़ . तज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनियरर्स, वकील, माजी सनदी अधिकारी यांच्या कोअर कमिटीच्या मार्गदर्शनानुसार पक्षाची वाटचाल राहील़ मुस्लिम, लिंगायत, धनगर समाज सोबत घेऊन मराठा समाजाचा पक्ष तिसरी आघाडी तयार करेल़ मराठा पक्ष आल्यानंतर आपली दुकाने बंद होणार या भितीपोटी सत्ताधारी आणि विरोधकांचा बदनामी करण्याचा खटाटोप सुरू आहे़ जनतेने या टिकाकारांकडे दुर्लक्ष करावे़ आम्ही प्रस्थापितांसमोर सक्षम पर्याय देऊ, असा विश्वास सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण