शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:12 IST

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाड़कर, शैलेंद्र नेरकर, मालवणकर आदी उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, या ठेकेदार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तिन दिवस सुट्टी दिली होती. हे कर्मचारी परप्रांतीय असून ते आपल्या गावी तिन दिवसात जावून येऊ शकत नाहीत ही सत्यस्थिती आहे. आगीची घटना घडली त्याठिकाणी साधारणतः 2000 कर्मचारी रहातात. मात्र घटनेच्या वेळी एकही कामगार तिथे उपस्थित नव्हता.

या आग लागलेल्या डेपोत महामार्गाच्या कामासाठी लागणारी स्पोटके, डिझेल, ऑईल साठा करून ठेवण्यात आले होते असे आता समोर येत आहे. मात्र या कंपनीने ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्याची परवानगी संबधित प्रशासनाकडून घेतलेली आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. याठिकाणी 500 टायर ठेवले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, फक्त 100 गाड्यांचीच नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केलेली आहे. त्यामुळे टायर बाबतचा कंपनीचा दावा बोगस आहे.संबधित ठिकाणी कोणत्याही आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील लोकांना धोका निर्माण झाला होता. याचीही दखल घेणे आवश्यक आहे. बोर्डवे लगत असलेल्या क्रशरच्या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आजुबाजूच्या परिसरातील घराना तडे गेले आहेत. या क्रशरच्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी घेतलेली आढळत नाही. त्यामुळे एक प्रकारे येथील काम अनधिकृतच सुरु आहे.पोलिसांनी ओसरगाव येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर टायरचे चलन , खरेदीची बिले, ओईलची बिले, स्पोटके साठवणुकीचा परवाना तपासण्याची गरज आहे. असे झाले तरच नेमके सत्य जनतेसमोर येईल.यापूर्वीही महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बेळणे ते कासार्डे पर्यन्तचा रस्ता अनेक ठिकाणी पावसाने खचल्याचे सांगत 98 कोटी रुपयांच्या विम्याचा दावा केला होता. आमच्या जागरूकपणामुळे त्याना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही. असाच प्रयत्न दिलीप बिल्डकॉन करीत असल्याचे प्राथमिक चित्र तरी आग प्रकरणामुळे दिसत आहे.सावंतवाड़ी तालुक्यातील सोनूर्ले येथील मायनिंग उत्खननामुळे तेथील ग्रामस्थाना त्रास सहन करावा लागत आहे. तेथील घराना तडे गेले आहेत. 2008 पासून परवाना घेता तिथे काम सुरु आहे. ओव्हरलोड वहातुक सुरु आहे. मात्र अधिकारी याची दखल घेताना दिसत नाहीत. ठेकेदार कंपन्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या खिशात टाकल्यासरखी ही स्थिती आहे. त्यामुळे जनतेला कोणी वालीच उरलेला नाहीं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग