शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:12 IST

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाड़कर, शैलेंद्र नेरकर, मालवणकर आदी उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, या ठेकेदार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तिन दिवस सुट्टी दिली होती. हे कर्मचारी परप्रांतीय असून ते आपल्या गावी तिन दिवसात जावून येऊ शकत नाहीत ही सत्यस्थिती आहे. आगीची घटना घडली त्याठिकाणी साधारणतः 2000 कर्मचारी रहातात. मात्र घटनेच्या वेळी एकही कामगार तिथे उपस्थित नव्हता.

या आग लागलेल्या डेपोत महामार्गाच्या कामासाठी लागणारी स्पोटके, डिझेल, ऑईल साठा करून ठेवण्यात आले होते असे आता समोर येत आहे. मात्र या कंपनीने ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्याची परवानगी संबधित प्रशासनाकडून घेतलेली आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. याठिकाणी 500 टायर ठेवले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, फक्त 100 गाड्यांचीच नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केलेली आहे. त्यामुळे टायर बाबतचा कंपनीचा दावा बोगस आहे.संबधित ठिकाणी कोणत्याही आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील लोकांना धोका निर्माण झाला होता. याचीही दखल घेणे आवश्यक आहे. बोर्डवे लगत असलेल्या क्रशरच्या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आजुबाजूच्या परिसरातील घराना तडे गेले आहेत. या क्रशरच्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी घेतलेली आढळत नाही. त्यामुळे एक प्रकारे येथील काम अनधिकृतच सुरु आहे.पोलिसांनी ओसरगाव येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर टायरचे चलन , खरेदीची बिले, ओईलची बिले, स्पोटके साठवणुकीचा परवाना तपासण्याची गरज आहे. असे झाले तरच नेमके सत्य जनतेसमोर येईल.यापूर्वीही महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बेळणे ते कासार्डे पर्यन्तचा रस्ता अनेक ठिकाणी पावसाने खचल्याचे सांगत 98 कोटी रुपयांच्या विम्याचा दावा केला होता. आमच्या जागरूकपणामुळे त्याना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही. असाच प्रयत्न दिलीप बिल्डकॉन करीत असल्याचे प्राथमिक चित्र तरी आग प्रकरणामुळे दिसत आहे.सावंतवाड़ी तालुक्यातील सोनूर्ले येथील मायनिंग उत्खननामुळे तेथील ग्रामस्थाना त्रास सहन करावा लागत आहे. तेथील घराना तडे गेले आहेत. 2008 पासून परवाना घेता तिथे काम सुरु आहे. ओव्हरलोड वहातुक सुरु आहे. मात्र अधिकारी याची दखल घेताना दिसत नाहीत. ठेकेदार कंपन्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या खिशात टाकल्यासरखी ही स्थिती आहे. त्यामुळे जनतेला कोणी वालीच उरलेला नाहीं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग