शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंधुदुर्ग : वाहून जाणाऱ्या तरुणास जीवदान, धैर्याचे कौतुक : सुकळवाड येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:46 IST

सुकळवाड सावंतवाडा येथील लवू सावंत (४०) या तरुणास ओहोळातील तुडुंब पाण्यात वाहत असताना तेथील ललित पाताडे या धाडसी युवकाने आपल्या सहकारी मित्रांसोबत पुरातून बाहेर काढून जीवदान दिले. त्यांच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देवाहून जाणाऱ्या तरुणास जीवदान, धैर्याचे कौतुक सुकळवाड येथील घटना

सिंधुदुर्गनगरी : सुकळवाड सावंतवाडा येथील लवू सावंत (४०) या तरुणास ओहोळातील तुडुंब पाण्यात वाहत असताना तेथील ललित पाताडे या धाडसी युवकाने आपल्या सहकारी मित्रांसोबत पुरातून बाहेर काढून जीवदान दिले. त्यांच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.लवू सावंत हे गेले काही दिवस घरातून बेपत्ता होते. ८ जुलैला जिल्ह्यात अतिवृष्टीदरम्यान नदीनाले दुथडी भरून वाहत होते. यादिवशी दुपारी ३ च्या दरम्यान सुकळवाड नदी पुलानजीक झाडीचा आधार घेऊन सावंत पुरातील पाण्यात होते. शेतात काम करणाऱ्या महिलांना ते नजरेस पडताच त्यांनी आरडाओरड केली.

लगेचच ललित पाताडे यांनी आदेश पाताडे, संदीप चव्हाण, लक्ष्मण काळसेकर या युवकांना सोबत घेत काही अंतर पाण्यात उतरून काठी व दोरीच्या सहाय्याने सावंत यांना काठावर आणून जीवदान दिले.सावंत यांच्या एका कानाच्या बाजूला जखम झाल्याचे आढळून आली. रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी सुकळवाड उपसरपंच स्वप्नील गावडे, भाई राणे, सुभाष टेंबुलकर, सुभाष म्हसकर आदींनी सहकार्य केले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग