शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सिंधुदुर्ग : कामात शिथिलता आणाल तर कारवाई : दीपक केसरकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:37 IST

चांदा ते बांदा योजनेतून शेतकऱ्यांना समृद्ध करायचे आहे. पण हे काम करीत असताना येथील अधिकाऱ्यांच्या कामात शिथिलता आली आहे. ती वेळीच दूर करा अन्यथा शासनाला कारवाईस भाग पाडाल, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

ठळक मुद्देकामात शिथिलता आणाल तर कारवाई : दीपक केसरकर संजीवनी कृषी प्रदर्शनात मार्गदर्शन

सावंतवाडी : चांदा ते बांदा योजनेतून शेतकऱ्यांना समृद्ध करायचे आहे. पण हे काम करीत असताना येथील अधिकाऱ्यांच्या कामात शिथिलता आली आहे. ती वेळीच दूर करा अन्यथा शासनाला कारवाईस भाग पाडाल, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

मंत्री केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेअंर्तगत सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या संजीवनी कृषी महोत्सवाला भेट दिली. तसेच आयोजित चर्चासत्रातही सहभाग घेतला.यावेळी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, अक्षय सामंत, चेतन भोजनावेळे, वेंगुर्लेचे सभापती यशवंत परब, दोडामार्ग सभापती गणपत नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, मुंबईतील अधिकारी संजीव जाधवर आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा कृषीसंपन्न झाला पाहिजे. शासनाने वेगवेगळ्या योजनांमधून कृषी पर्यटनासाठी निधी दिला आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्या. येथील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर शेतकरी सक्षम व समृद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्गमध्ये यापूर्वी मत्स्य तसेच कृषी या विभागांकडे कोणी लक्ष दिले नाही. पण आता या विभागांना जर समृद्ध केले तरच सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध होणार आहे असे सांगत वनविभागानेही आपल्या क्षेत्रात वेगवेगळी कामे हाती घेतली पाहिजेत. निधी आला आहे, तो वेळेत खर्च करा. दर्जेदार कामे करून दाखवा. आपला जिल्हा हा राज्यात आदर्श जिल्हा असल्याचे कामातून दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सिंधुदुर्गमध्ये एखादा पर्यटक यायचा झाला तर तो कुठे राहणार येथून आपली सुरुवात होते. पण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. त्यांच्या शेतात कॉटेजेस उभारा. त्यातून पर्यटक येतील.

यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. फक्त अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. येथील अधिकाऱ्यांच्या कामामध्ये थोडीशी शिथिलता आली आहे. ती वेळीच दूर करा. अन्यथा आम्हांला कारवाईस भाग पाडाल, असा इशाराही केसरकर यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात साडेबेचाळीस हजार हेक्टर जागेत वनसंज्ञा आहे. पण या जमिनीही खास बाब म्हणून शासनाने विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विकलेल्या जमिनीत खासगी पर्यटन प्रकल्प उभारा. त्यातून रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे.आंबोली पर्यटन विकासासाठी वनविभाग नेहमी प्रयत्नशील आहे. त्यांना अधिकाधिक सुविधा दिल्या जातील, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनीही मोठ्या प्रमाणात वनविभागाकडे निधी आला आहे. नरेंद्र डोंगर तसेच आंबोलीतील विश्रामगृहाचे नूतनीकरण ही कामे हाती घेण्यात येणार असून ती कामे पूर्ण झाली की मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील.

रांगणागड विकासाचा केंद्रबिंदू ठरेल असे सांगितले. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतीचे यांत्रिकीकरण, श्री पद्धतीने भातशेती व कृषी पर्यटन या विषयांवर हनुमान गवस, अक्षय सामंत व चेतन भोजनावळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारले त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.कारणे दाखवा नोटीसरविवारच्या चर्चासत्रास कृषी विभागाचे अनेक अधिकारी गैरहजर होते. यावर पालकमंत्री दीपक केसरकर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी हा संताप तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत यांच्या समोर व्यक्त करीत सोमवारी पुन्हा चर्चासत्र होणार आहे. यावेळी जर कृषी विभागाचे अधिकारी हजर नसतील तर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गagricultureशेती