शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सिंधुदुर्ग : कणकवलीत रंगणार पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:49 IST

कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या कार्यस्थळावर 13 मे रोजी होणारे मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि यशस्वी करण्याचा निर्धार  येथे झालेल्या सहविचार सभेत करण्यात आला.

ठळक मुद्देदिंडी, लघुपट महोत्सव, खाद्यजत्रा, कवितांचा नाट्याविष्कार सहविचार सभेत संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार : विविध समित्यांची स्थापना

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या कार्यस्थळावर 13 मे रोजी होणारे मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि यशस्वी करण्याचा निर्धार  येथे झालेल्या सहविचार सभेत करण्यात आला.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सिंधुभूमी कला अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार, संमेलनाचे कार्यवाह सतीश लळीत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला शहरातून दिंडी, मालवणी लघुपट महोत्सव, मालवणी खाद्यजत्रा, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार, काही नाट्यप्रवेश, नाटक असे वेगवेगळे उपक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.

दि. १३ मे रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणहकार गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे. उदघाटक म्हणुन पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नीतिन करमळकर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी संमेलनाध्यक्ष कवि डॉ. महेश केळुसकर अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या व त्यानिमित्ताने आयोति केलेल्या अन्य कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी अकादमीचे कार्यवाह कवी मधुसुदन नानिवडेकर, विजय गावकर, अभय खडपकर, श्याम नाडकर्णी, विलास खानोलकर, कमलेश गोसावी, डॉ. सई लळीत, डॉ. संदीप नाटेकर, विकास गावकर, कुणाल मांजरेकर, राजश्री धुमाळे, कल्पना मलये, राजस रेगे, रवींद्र मुसळे, डॉ. विठ्ठल गाड, महेश खोत, डॉ. रामदास बोरकर, रोहन पारकर, सचिन शिरवलकर, गीतांजली कामत, सुप्रिया तायशेटे, प्राची कर्पे आणि  अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी संमेलन व अन्य कार्यक्रमांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व काही महत्वाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. मालवणी लघुपट महोत्सव समिती (अध्यक्ष विजय गावकर), मालवणी खाद्यजत्रा समिती (अध्यक्षा राजश्री धुमाळे), दिंडी आयोजन (विवेकानंद वाळके), नेपथ्य व सजावट समिती (अध्यक्ष डॉ. संदीप नाटेकर), निमंत्रण व साहित्यिक संपर्क समिती (अध्यक्ष श्याम नाडकर्णी), मंडप व्यवस्था समिती (अध्यक्ष समर्थ राणे), प्रसिद्धी समिती (अध्यक्ष सतीश लळीत), हास्यकवि संमेलन समिती (अध्यक्ष कमलेश गोसावी) अशा अनेक समित्या नेमण्यात आल्या. संमेलनाच्या प्रारंभी पारंपरिक गाऱ्हाणे घालण्याची व संमेलनातील कायक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी विलास खानोलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या समित्यांच्या स्वतंत्र बैठका होऊन सदस्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. कणकवली शहर व परिसरातील वेगवेगळ्‌या क्षेत्रातील मान्यवरांना या समित्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. संमेलनाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे आणि सामाजिक माध्यमांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आणि त्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रम हे सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रमोद जठार व कार्यवाह सतीश लळीत यांनी केले आहे.मालवणी कवितांना मिळणारा प्रतिसाद पाहता कविसंमेलनासाठी एक तास वेळ देण्यात आला आहे. तसेच, याला जोडुनच हास्यकवि संमेलनही होणार आहे. मालवणी कवितांच्या नाट्याविष्कारही सादर करण्यात येणार आहे. संमेलनाची सविस्तर कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक