शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सिंधुदुर्ग : सिंधुसरस कृषी क्षेत्रासाठी पर्वणी : दीपक केसरकर, आंगणेवाडी येथे महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:58 IST

भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

ठळक मुद्देसिंधुसरस कृषी क्षेत्रासाठी पर्वणी : दीपक केसरकरआंगणेवाडी येथे महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण : भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत राज्यशासन व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधु सरस महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक विजय चव्हाण, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तहसीलदार समीर घारे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव शेळके, महाराष्ट्र महाक्वॉयर बोर्डच्या लीना बनसोडे, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपविभागीय कृषी अधीक्षक अडसूळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश महाले, जीवनोन्नोती अभियानाचे सिंधुदुर्ग प्रमुख देविदास नारनवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच इतर तालुक्यांचे गटविकास अधिकारी व प्रमुख व आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, अनंत आंगणे आदी उपस्थित होते. बचतगटांचा सिंधु सरसला मोठा प्रतिसाद मिळाला असून बहुतांश सर्व स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचा व खाद्यपदार्थांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी करून केसरकर यांनी बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना धान्य महोत्सव, चर्चासत्रे, पुरस्कार वितरण, गृहोपयोगी वस्तू, सूक्ष्म सिंचन, खाद्य पदार्थांचेही स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असून लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.

कृषी महोत्सवाचे उद्घाटनआंगणेवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हा कृषी मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व चाकरमान्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात येथील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने आंगणेवाडी येथील कृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला असल्याचे सांगितले.विविध २०० स्टॉलशासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे. सरकारी योजनांची माहिती देणारे कृषी विभागाच्या ४० स्टॉल्ससह विविध विभागांचे २०० स्टॉल लावले जातील.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर agricultureशेतीsindhudurgसिंधुदुर्ग