शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सिंधुदुर्ग : दुर्लक्षितपणामुळे अपघाताची भीती, मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:30 IST

मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षितपणामुळे अपघाताची भीती,  वाहन चालविणे धोकादायकमळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी 

सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.मळेवाड-कोंडुरा या सार्वजनिक बांधकामच्या महामार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचे नवीन बांधकाम सध्या सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: कोलमडत असे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गेली कित्येक वर्षे लोकांकडून केली जात होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या या कामाच्या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच ठेकेदाराने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे टाळले असून केव्हाही अपघात होऊ शकतो अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुलाच्या बांधकामाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढून त्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे.मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी दिशादर्शक, बॅरिकेट्स तसेच धोेकादायक सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असताना तशी कोणतीही व्यवस्था त्या कामाच्या ठिकाणी करण्यात आली नाही.

एका बाजूने पुलाचे काम, तर दुसऱ्या बाजूने नदीचे पात्र अशा दोन्ही संकटाच्या मधून वाहनचालकांना तेथून मार्ग काढावा लागत आहे. मात्र, अपघात होऊ नये याची खबरदारी म्हणून त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना न राबविल्याने दिवसा सोडाच, पण रात्रीच्या वेळी वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे.मळेवाडहून कोंडुऱ्याच्या दिशेने येत असताना पुलाच्या कामाच्या आधी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे हे काम वाहनचालकांच्या दृष्टीस येत नाही. त्यामुळे एखादा वाहनचालक थेट पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ शकतो. याबाबत बांधकाम विभागाने गांभीर्याने घेत याबाबत विचार करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.पुलाचे काम धिम्यागतीनेपालक मंत्री दीपक के सरकर यांनी कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची अलीकडेच येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत चौकशी करीत अधिकाऱ्यांना काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, असे असूनही पुलाचे काम धिम्यागतीने सुरू असून, पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना या पुलाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग