शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

सिंधुदुर्ग शैक्षणिकदृष्ट्या राज्यात आघाडीवर

By admin | Updated: February 7, 2017 23:05 IST

‘प्रथम’ संस्थेचा अहवाल : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घेतल्या चाचण्या

सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक गुणवत्तेचा देशव्यापी अहवाल देणाऱ्या ‘प्रथम’ अशासकीय संस्थेच्या ‘असर’ या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणित व पुस्तक वाचन या दोन विषयांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातून हे चित्र समोर आले आहे. या यादीत सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.‘प्रथम’ ही एक स्वयंसेवी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील सरकारी शाळांमधील गुणवत्तेचे चित्र समोर आणले आहे. यात शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा हा निकष समोर ठेवून राज्यात एकच अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता बहरत असल्याचा अहवाल ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केला आहे. या निमित्ताने येथील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.त्यानंतर इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता येण्याचे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७१.६ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सोलापूर जिल्ह्याने पटकाविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. याची सरासरी ८८ टक्के आहे. तर तृतीय क्रमांकावर रत्नागिरीचा समावेश आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तिसरी ते पाचवी बजाबाकी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सरासरी ३९.१ टक्के एवढे आहे. या प्रकारात मात्र सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून, त्याची सरासरी टक्केवारी ५६.९ टक्के आहे. तर प्रथम क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ६४.२ टक्के एवढी आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी आहे. (प्रतिनिधी)सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी तिसऱ्या स्थानीइयत्ता पहिलीच्या पुस्तकातील मजकुराचे वाचन करू शकणाऱ्या इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७२.५ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सिंधुदुर्गने पटकाविला असून, त्याची ९४ एवढी टक्केवारी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९२.५ एवढी आहे. तृतीय क्रमांकावर रत्नागिरी जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९१.४ एवढी आहे. सर्वांत शेवटचा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याचा असून, त्याची टक्केवारी ५१.१ एवढी आहे.