शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सिंधुदुर्ग शैक्षणिकदृष्ट्या राज्यात आघाडीवर

By admin | Updated: February 7, 2017 23:05 IST

‘प्रथम’ संस्थेचा अहवाल : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घेतल्या चाचण्या

सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक गुणवत्तेचा देशव्यापी अहवाल देणाऱ्या ‘प्रथम’ अशासकीय संस्थेच्या ‘असर’ या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणित व पुस्तक वाचन या दोन विषयांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातून हे चित्र समोर आले आहे. या यादीत सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.‘प्रथम’ ही एक स्वयंसेवी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील सरकारी शाळांमधील गुणवत्तेचे चित्र समोर आणले आहे. यात शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा हा निकष समोर ठेवून राज्यात एकच अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता बहरत असल्याचा अहवाल ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केला आहे. या निमित्ताने येथील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.त्यानंतर इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता येण्याचे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७१.६ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सोलापूर जिल्ह्याने पटकाविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. याची सरासरी ८८ टक्के आहे. तर तृतीय क्रमांकावर रत्नागिरीचा समावेश आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तिसरी ते पाचवी बजाबाकी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सरासरी ३९.१ टक्के एवढे आहे. या प्रकारात मात्र सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून, त्याची सरासरी टक्केवारी ५६.९ टक्के आहे. तर प्रथम क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ६४.२ टक्के एवढी आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी आहे. (प्रतिनिधी)सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी तिसऱ्या स्थानीइयत्ता पहिलीच्या पुस्तकातील मजकुराचे वाचन करू शकणाऱ्या इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७२.५ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सिंधुदुर्गने पटकाविला असून, त्याची ९४ एवढी टक्केवारी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९२.५ एवढी आहे. तृतीय क्रमांकावर रत्नागिरी जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९१.४ एवढी आहे. सर्वांत शेवटचा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याचा असून, त्याची टक्केवारी ५१.१ एवढी आहे.