शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सिंधुदुर्ग : शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:22 IST

शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल.त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देशिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणेकणकवलीत स्कुलचे भूमिपूजन कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाणारी भाषा आहे. तरुणांना भविष्यात नोकरीसाठी मुलाखत देताना इंग्रजी वक्तृत्व आवश्यक असणार आहे. त्यामुळे ही भाषा अवगत असणे आवश्यक असून प्रगत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले. कणकवली वरचीवाडी येथे पोदार इंटरनॅशनल स्कुलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार नीतेश राणे, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ , नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ आदी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल ही राज्यात नव्हे तर देशातही नावाजलेली संस्था आहे. कणकवलीत त्यांची शाळा सुरू होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब आहे. आजचे भूमिपूजन म्हणजे भविष्यातील भावी पिढीच्या उद्धाराची नांदी आहे. या शाळेतून शिकलेले विद्यार्थी भविष्यात इंजिनिअर, वैज्ञानिक, वैमानिक, डॉक्टर होतील आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करतील .येथील जमिनमालकांनी शाळेच्या माध्यमातून विकासासाठी आपली जमीन दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. या शाळेत स्थानिकाना नोकऱ्या द्या.अशी काहीजण मागणी करतात. पण शाळेचा दर्जा टिकावा यासाठी स्थानिकांपैकी उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तिनाच शिक्षक म्हणून नोकरी द्या .असेही नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.नीतेश राणे म्हणाले, कोणासाठी स्पर्धा करण्यासाठी हा शाळेचा उपक्रम हाती घेतलेला नाही. सिंधुदूर्गातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया दिवसेंदिवस प्रगत होत असताना त्याना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

अनेक व्यक्तींकडून आमची प्रतिमा मलिन केली जाते. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्षात बाहेरुन आलेले लोक आमची भेट घेतात. तेव्हा त्याना आमच्या बद्दल वेगळाच अनुभव येतो. तसे ते बोलून दाखवतात. निवडणुकीत फक्त आश्वासने नकोत तर ती पूर्ण केली पाहिजेत .असे आमचे मत असून त्यामुळेच आम्ही वचनपुर्ती करीत आहोत. असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले. टिकेचे काम देवून ठेवले आहे! या शाळेच्या कामाचे भूमिपूजन करी पर्यन्त अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे कणकवलीत प्रकल्प आणणे कठीण आहे. कारण जे करु ते आम्हीच करु . दुसऱ्याना ते करु देणार नाही. अशी मानसिकता असलेले काही लोक येथे आहेत.

या शाळेचे उदघाट्न जो पर्यन्त होत नाही तोपर्यन्त अनेक अफवा पसरविल्या जाणार आहेत . हे आम्हाला माहीत आहे. आमच्यावर टिका करण्याचे काम एका कुटुंबियाना पुढील पाच वर्षासाठी देऊन ठेवलेले आहे. ते काम करतील असा टोलाही कोणाचेही नाव न घेता आमदार नीतेश राणे यानी यावेळी लगावला.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग