शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:22 IST

शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल.त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देशिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणेकणकवलीत स्कुलचे भूमिपूजन कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाणारी भाषा आहे. तरुणांना भविष्यात नोकरीसाठी मुलाखत देताना इंग्रजी वक्तृत्व आवश्यक असणार आहे. त्यामुळे ही भाषा अवगत असणे आवश्यक असून प्रगत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले. कणकवली वरचीवाडी येथे पोदार इंटरनॅशनल स्कुलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार नीतेश राणे, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ , नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ आदी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल ही राज्यात नव्हे तर देशातही नावाजलेली संस्था आहे. कणकवलीत त्यांची शाळा सुरू होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब आहे. आजचे भूमिपूजन म्हणजे भविष्यातील भावी पिढीच्या उद्धाराची नांदी आहे. या शाळेतून शिकलेले विद्यार्थी भविष्यात इंजिनिअर, वैज्ञानिक, वैमानिक, डॉक्टर होतील आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करतील .येथील जमिनमालकांनी शाळेच्या माध्यमातून विकासासाठी आपली जमीन दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. या शाळेत स्थानिकाना नोकऱ्या द्या.अशी काहीजण मागणी करतात. पण शाळेचा दर्जा टिकावा यासाठी स्थानिकांपैकी उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तिनाच शिक्षक म्हणून नोकरी द्या .असेही नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.नीतेश राणे म्हणाले, कोणासाठी स्पर्धा करण्यासाठी हा शाळेचा उपक्रम हाती घेतलेला नाही. सिंधुदूर्गातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया दिवसेंदिवस प्रगत होत असताना त्याना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

अनेक व्यक्तींकडून आमची प्रतिमा मलिन केली जाते. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्षात बाहेरुन आलेले लोक आमची भेट घेतात. तेव्हा त्याना आमच्या बद्दल वेगळाच अनुभव येतो. तसे ते बोलून दाखवतात. निवडणुकीत फक्त आश्वासने नकोत तर ती पूर्ण केली पाहिजेत .असे आमचे मत असून त्यामुळेच आम्ही वचनपुर्ती करीत आहोत. असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले. टिकेचे काम देवून ठेवले आहे! या शाळेच्या कामाचे भूमिपूजन करी पर्यन्त अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे कणकवलीत प्रकल्प आणणे कठीण आहे. कारण जे करु ते आम्हीच करु . दुसऱ्याना ते करु देणार नाही. अशी मानसिकता असलेले काही लोक येथे आहेत.

या शाळेचे उदघाट्न जो पर्यन्त होत नाही तोपर्यन्त अनेक अफवा पसरविल्या जाणार आहेत . हे आम्हाला माहीत आहे. आमच्यावर टिका करण्याचे काम एका कुटुंबियाना पुढील पाच वर्षासाठी देऊन ठेवलेले आहे. ते काम करतील असा टोलाही कोणाचेही नाव न घेता आमदार नीतेश राणे यानी यावेळी लगावला.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग