शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी पांढरपट्टे उतरले भात लावणीस, बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:53 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पांढरपट्टे उतरले भात लावणीसबळीराजासाठी एक दिवस उपक्रमसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.

दरम्यान या उपक्रमाचा जिल्हास्तर शुभारंभ पणदूर येथे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या उपस्थितीत सकाळी पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात उतरत लावणी केली.पणदूर येथील शेतावर बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमासाठी उपाध्यक्ष रणजित देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. जगताप, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी अध्यक्षा सरोज परब, पणदूर सरपंच दादा साईल, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र आंगणे, सुनिल वारंग, विद्यार्थी, पालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदने विद्यार्थ्यांना शेतीची महती सांगणारा राबविलेला बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. शेतीबद्दलची माहिती व महत्व ज्याला समजले तो खरच खूप भाग्यवान आहे असे मी समजतो. शेतीच्या माध्यमातून मिळणारे यश हे मनाला समाधान देते. शाळेत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर बनणार नाही पण शेतीतून आदर्शवत शेतकरी मात्र नक्की बनतील. भविष्यात शेती शिक्षण तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.बालवयातच शेतीचे महत्व रूजायला हवेरेश्मा सावंत म्हणाल्या, युवा पिढीचा शेतीकडे कल कमी होवू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. बालवयातच शेतीचे महत्त्व रूजायला हवे आणि तसे झाल्यास जिल्ह्यात प्रगत व समृद्ध शेतकरी निर्माण होतील.

विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतात भाजीपाला, भातशेती यासह अन्य पिकांची लागवड केल्यास शेतीविषयक प्रेम निर्माण होऊन या उपक्रमाचा उद्देश सफल होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाचा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शुभारंभ केल्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत शेतात लावणी केली.