शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

अपुऱ्या सोयीसुविधांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा पिछाडीवर- आज राष्ट्रीय क्रीडादिन :

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

जिल्ह्यात क्रीडा चळवळीसाठी प्रयत्न आवश्यक

विनायक वारंग - वेंगुर्ले-पर्यटन, सांस्कृतिक, कला, राजकारण आदी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. मात्र, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील स्थितीचा विचार करता जिल्हा मागे पडल्याचेच चित्र आहे. क्रीडा क्षेत्रातील अपुऱ्या सोयी, अत्यल्प आर्थिक सहाय्य, मैदानांची झालेली दुरवस्था, क्रीडाविषयक धोरणे नसणे यामुळे क्रीडाक्षेत्र मागासलेले राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी, सामाजिक संस्थांनी, क्रीडा संघटनांनी व मंडळांनी एकत्र येत क्रीडा क्षेत्राच्या यशस्वीतेसाठी लढा उभारणे गरजेचे बनले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळात प्राविण्य असणारे अनेकजण आहेत. परंतु त्यांच्यातील कोणी आर्थिक अडचणीमुळे तर कोणी अपुऱ्या प्रशिक्षणामुळे मागे राहत आहेत. यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. जिल्ह्यात विविध क्रीडा मंडळांमार्फत विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. क्रीडामंडळांनी एवढ्यावरच मर्यादीत न राहता एकाच खेळाच्या आयोजनासह अन्य खेळांकडेही लक्ष पुरविणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धा आयोजनाआधी प्रशिक्षणाची सोयही केल्यास खेळाडूंना योग्य सराव व मार्गदर्शन लाभेल. यातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील. यावेळी शासनाने अशा मंडळांना उत्स्फूर्तपणे साथ देणे आवश्यक असून क्रीडाक्रांतीकरिता धडपडणाऱ्या मंडळांना शासनाने साहित्य खरेदी व प्रशिक्षणासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देत त्यांच्या योग्य वापरावर निगराणी ठेवण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे शासनाने प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहाचा घाट घातला आहे तसेच क्रीडांगणाकरिताही प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध क्रीडांगणांच्या देखभालीचीही जबाबदारी सर्वांनीच उचलली पाहिजे.जिल्ह्यात क्रीडा विकासाचा ध्यास घेतलेल्या संस्थांना शासनाने मदत करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात क्रीडा केंद्र सुरु केले पाहिजे. काही ठिकाणी क्रीडा केंद्रे सुरु आहेत. मात्र, खेळाडूंनी अपुऱ्या सुविधांमुळे दुर्लक्ष केले आहे. वेंगुर्ले येथील क्रीडा केंद्र तर मैदान बनविण्यावरुनही वादात आहे. आजही या मैदानावरील धावपट्टीचे काम योग्य नाही. मैदानावर पाणी साठून राहते, पाण्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये कलागुण ठासून भरलेले असतात. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे ते मागे पडतात. परिश्रम करण्याची जिद्द असते. मात्र, पोषण आहार मिळत नसल्याने शारीरिक सुदृढता येत नाही. त्यामुळे परिश्रमावरही परिणाम होतो. तसेच खेळाच्या साहित्याची असणारी कमतरताही मोठी समस्या बनत चालली आहे. अलिकडे खेळाच्या क्षेत्राला व्यवसायाचे व व्यवस्थापनाचे स्वरुप प्राप्त होत आहे. स्पर्धा आयोजन आर्थिकदृष्ट्या न परवडणारे व व्यवस्थापनही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा जास्तीत जास्त योग्य वापर होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडा साहित्य, मैदाने व मार्गदर्शनाची सोय उपलब्ध केली पाहिजे. यासाठी क्रीडा संघटनांनीही एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. तरच जिल्हात क्रीडा चळवळ सुरु होईल.जिल्हा क्रीडा विभागाचा पुढाकार आवश्यकजिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता जिल्हा क्रीडा विभागाच्या पुढाकाराची आवश्यकता आहे. ओरोस येथे उपलब्ध मैदाने विनावापर पडून असतात. मात्र, वापरासाठी मागणी केली असता, संस्थांना भाडे आकारले जाते आणि संस्था हे भाडे खेळाडूंकडून वसूल करते. क्रीडा विभागाने मैदान व साहित्य तोडफोड न करण्याच्या अटीवर विनाभाडे वापरण्यास दिल्यास खेळाडूंना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होईल. यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. क्रीडादिन विशेष