शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

सिंधुदुर्ग  : स्वच्छ जिल्ह्यात पाणी होतेय दूषित, आरोग्य विभागाचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:52 PM

स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ जिल्ह्यात पाणी होतेय दूषित, आरोग्य विभागाचा सर्व्हे ग्रामीण भागात अकरा टक्के तर शहरी भागात साडेचार टक्के

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

एप्रिल अखेर तपासण्यात आलेल्या १३८० पाणी नमुन्यांपैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात ग्रामीण भागात १०.५४ टक्के तर शहरी भागात ४.४ टक्के दूषित पाणी आहे. ही टक्केवारी पाहता पाणी शुद्धिकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला फार महत्त्व आहे. त्यामुळेच जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पाणी नमुने दरमहा तपासले जातात. त्यात दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांच्या स्रोतांचे शुद्धिकरण केले जाते.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १३८० पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात वैभववाडी तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे.या पाणी नमुन्यांच्या आकडेवारीवरून स्वच्छ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी दूषित होत चालले असल्याचे स्पष्ट होत आहे. यात तब्बल १०.५४ टक्के ग्रामीण भागात तर ४.४ टक्के शहरी भागात दूषित पाणी आहे. मात्र संबंधित पाणी स्रोतांचे शुद्धिकरण करण्यात आले आहे. एकंदरीत दूषित पाण्याची आकडेवारीही स्वच्छ सिंधुदुर्गला शोभनिय नाही.

टीसीएलऐवजी अन्य यंत्रणेचा शुद्धिकरणासाठी वापर व्हावामे महिना चालू असतानाच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. तसेच पाणी साठेही आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत पाण्यात टीसीएल पावडर टाकल्यास आतील जलचर प्राणी मृत होण्याची शक्यता आहे. जलचर प्राणी पाण्यात मृत झाल्यास उपलब्ध पाणीसाठाही पिण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत टीसीएल पावडरऐवजी अन्य पाणी शुद्धिकरण यंत्रणेचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र तशी यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध नाही.दूषित पाण्याचा अहवालदोडामार्ग - १२३ पाणी नमुने, ८ दूषित.सावंतवाडी - २३३ पाणी नमुने, १२ दूषित.वेंगुर्ला - १२३ पाणी नमुने, १२ दूषित.कुडाळ- १८९ पाणी नमुने, ८ दूषित.मालवण - १७१ पाणी नमुने, ११ दूषित.कणकवली - २६९ पाणी नमुने, ३९ दूषित.देवगड - २४७ पाणी नमुने, ४२ दूषित.वैभववाडी - २५ पाणी नमुने, ७ दूषित.एकूण - १३८० नमुने, १३९ दूषित. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गwater pollutionजल प्रदूषण