शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सिंधुदुर्ग : शेवरे, पवार यांचे साहित्य नवीन साहित्यिकांना प्रेरणा देणारे  : प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 16:21 IST

आजच्या तरूण नव साहित्यिकांना शेवरे व पवार यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ््यात कणकवली नगरवाचनालयात आयोजित कार्यक्रमात काढले.

ठळक मुद्दे शेवरे, पवार यांचे साहित्य नवीन साहित्यिकांना प्रेरणा देणारे  : प्रेमानंद गज्वी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन

खारेपाटण : आजच्या तरूण नव साहित्यिकांना शेवरे व पवार यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ््यात कणकवली नगरवाचनालयात आयोजित कार्यक्रमात काढले.

पारंपरिक भाषेतील शब्दांना छेद देऊन आपण आपले नवीन साहित्यिक शब्द तयार केले पाहिजेत. भारताचा इतिहास हा सुमारे ८००० वर्षांपूर्वीचा असून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची वेळ आता आली आहे. आपल्या समाजातील साहित्यिकांनी, संशोधकांनी व रसिकांनी पुढे येऊन तो नव्याने लिहिला पाहिजे. सिंधुदुर्गसारख्या निसर्गरम्य जिल्ह्यात येथील उपेक्षित समाजात आ. सो. शेवरे, उत्तम पवार यांसारखे साहित्यिक निर्माण झाले तो समाज कधीच मागे राहणार नाही.सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील नामवंत दिवंगत ज्येष्ठ दलित साहित्यिक व विद्रोही कवी आ. सो. शेवरे तसेच तरुणांना प्रेरणा देणारे आंबेडकर चळवळीतील तरूण कवी उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आ. सो. शेवरे जीवनगौरव व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्याचे घोषित केले होते.कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त राजा ढाले, सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार विजेते कवी अरूण इंगवले, डॉ. सोमनाथ कदम, कवयित्री संध्या तांबे, डॉ. श्रीधर पवार, सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कवयित्री संध्या तांबे यांनी आ. सो. शेवरे यांच्या जीवन कार्याबाबत भाष्य करणारा आढावा घेतला. तर सोमनाथ कदम यांनी आपल्या मनोगतात कवी उत्तम पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. कवी इंगवले यांनीही आपले विचार मांडले. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गच्यावतीने यावेळी पुरस्कार वितरण सोहळ््याला विशेष उपस्थित असलेल्या कवी आ. सो. शेवरे यांच्या पत्नी मायावती शेवरे तसेच कवी उत्तम पवार यांच्या पत्नी निलम पवार यांचा प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ््याला रत्नागिरी व सिंधुदुर्गातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रास्ताविक सिद्धार्थ तांबे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख अनिल कदम यांनी करून दिली. यावेळी डॉ. श्रीधर पवार, सुनील हेतकर यांनी आपले विचार मांडले.पौराणिक साहित्य जतन होणे गरजेचे !आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार विजेते व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा ढाले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्याच्यामध्ये धैर्य नाही तो कधीही कार्यकर्ता होऊ शकत नाही. आंबेडकरी चळवळ टिकवून ठेवण्याचे काम आम्ही केले. याचबरोबर या चळवळीतून साहित्यिकांची फळी निर्माण करण्याचे कार्यदेखील केले. आंबेडकर चळवळीचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यासाठी आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे.

आपले साहित्य नुकत्याच गोष्टी सांगणारे असू नये. तर ते विचार करायला लावणारे असावे. एकांगी इतिहास मांडणारी प्रवृत्ती मोडून काढली पाहिजे व लढाऊ प्रवृत्तीच्या माणसांनी आपली मानसिकता ओळखून गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे. आपल्या लोकशाही देशात आजही आदिवासी लोकांना अंगभर कपडे नाहीत. लोकशाहीला हे फार घातक आहे. तसेच पौराणिक साहित्यांचे जतन होणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग