शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सिंधुदुर्ग : आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल : परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:11 IST

जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

कणकवली : जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री फक्त लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले पण जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी काहीही घोषित केले नाही, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील मनसेच्या कार्यालयात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आले. पण जिल्ह्यातील विकासकामांबाबत ते काहीही बोलले नाहीत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत. वैद्यकीय अधिकारी नाहीत. मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हिताचा काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्य पुरेसे नाही.जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्ता डांबरीकरणाची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऊर्जामंत्र्यांनी जनतेची उपेक्षा केलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांचे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरोग्याबाबत फक्त घोषणा होतात. परंतु कृती होत नाही. आदिवासी जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे.सध्याच्या राजकीय वातावरणाकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.

कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. ही जनतेची दिशाभूल आहे. शिवसेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करू नये, जनतेला आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपने जनतेला सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना-भाजपावाले निवडणुकीपुरते एकत्र येतात. कधी भांडतात पुन्हा एक होतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांना युती नको होती. तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी युती केली आणि आता शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनने पालघरमधील निवडणुकीत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. भाजप निवडणुका कशा जिंकते याची पोलखोल पालघरमधील निवडणुकीत दिसून आली.- परशुराम उपरक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर