शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

सिंधुदुर्ग : आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल : परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:11 IST

जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

कणकवली : जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री फक्त लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले पण जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी काहीही घोषित केले नाही, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील मनसेच्या कार्यालयात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आले. पण जिल्ह्यातील विकासकामांबाबत ते काहीही बोलले नाहीत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत. वैद्यकीय अधिकारी नाहीत. मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हिताचा काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्य पुरेसे नाही.जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्ता डांबरीकरणाची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऊर्जामंत्र्यांनी जनतेची उपेक्षा केलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांचे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरोग्याबाबत फक्त घोषणा होतात. परंतु कृती होत नाही. आदिवासी जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे.सध्याच्या राजकीय वातावरणाकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.

कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. ही जनतेची दिशाभूल आहे. शिवसेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करू नये, जनतेला आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपने जनतेला सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना-भाजपावाले निवडणुकीपुरते एकत्र येतात. कधी भांडतात पुन्हा एक होतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांना युती नको होती. तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी युती केली आणि आता शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनने पालघरमधील निवडणुकीत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. भाजप निवडणुका कशा जिंकते याची पोलखोल पालघरमधील निवडणुकीत दिसून आली.- परशुराम उपरक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर