शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सिंधुदुर्ग : आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल : परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:11 IST

जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

कणकवली : जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री फक्त लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले पण जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी काहीही घोषित केले नाही, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील मनसेच्या कार्यालयात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आले. पण जिल्ह्यातील विकासकामांबाबत ते काहीही बोलले नाहीत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत. वैद्यकीय अधिकारी नाहीत. मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हिताचा काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्य पुरेसे नाही.जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्ता डांबरीकरणाची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऊर्जामंत्र्यांनी जनतेची उपेक्षा केलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांचे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरोग्याबाबत फक्त घोषणा होतात. परंतु कृती होत नाही. आदिवासी जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे.सध्याच्या राजकीय वातावरणाकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.

कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. ही जनतेची दिशाभूल आहे. शिवसेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करू नये, जनतेला आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपने जनतेला सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना-भाजपावाले निवडणुकीपुरते एकत्र येतात. कधी भांडतात पुन्हा एक होतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांना युती नको होती. तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी युती केली आणि आता शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनने पालघरमधील निवडणुकीत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. भाजप निवडणुका कशा जिंकते याची पोलखोल पालघरमधील निवडणुकीत दिसून आली.- परशुराम उपरक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर