शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

सिंधुदुर्ग : नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोप, देशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:52 IST

नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोपदेशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगारअडसूळ यांनी दिली ओरोस कृषीभवन येथे येथील आरपीडी हायस्कूलला भेट

सावंतवाडी : नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.ओरोस कृषीभवन येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार अडसूळ यांनी येथील आरपीडी हायस्कूलला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुुख बाळा परब, शहरप्रमुख शब्बीर मणियार, दिनेश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अडसूळ पुढे म्हणाले, नोटा बंदीमुळे आज राज्यातील एकूण जिल्हा बँकेतील ३३ बँकातील ५ हजार ८०० कोटी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय सरकारने कर्जमाफी केली. याचे पैसेही जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, तेही पैसे नोटाबंदीमुळे सद्यस्थितीत अडकून पडले आहेत.

आपण पंतप्रधानांचे याबाबत लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही. जीएसटीचा निर्णय हा जरी चांगला असला तरी घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून सर्वसामान्य व्यापाराला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान येणाऱ्या बॅजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्षांनी घेतली सदिच्छा भेटखासदार अडसूळ हे सावंतवाडीत आल्याचे समजताच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची आरपीडी कॉलेजमध्ये जाऊन भेट घेत नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळRatnagiriरत्नागिरी