शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग : नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोप, देशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:52 IST

नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोपदेशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगारअडसूळ यांनी दिली ओरोस कृषीभवन येथे येथील आरपीडी हायस्कूलला भेट

सावंतवाडी : नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.ओरोस कृषीभवन येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार अडसूळ यांनी येथील आरपीडी हायस्कूलला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुुख बाळा परब, शहरप्रमुख शब्बीर मणियार, दिनेश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अडसूळ पुढे म्हणाले, नोटा बंदीमुळे आज राज्यातील एकूण जिल्हा बँकेतील ३३ बँकातील ५ हजार ८०० कोटी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय सरकारने कर्जमाफी केली. याचे पैसेही जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, तेही पैसे नोटाबंदीमुळे सद्यस्थितीत अडकून पडले आहेत.

आपण पंतप्रधानांचे याबाबत लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही. जीएसटीचा निर्णय हा जरी चांगला असला तरी घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून सर्वसामान्य व्यापाराला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान येणाऱ्या बॅजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्षांनी घेतली सदिच्छा भेटखासदार अडसूळ हे सावंतवाडीत आल्याचे समजताच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची आरपीडी कॉलेजमध्ये जाऊन भेट घेत नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळRatnagiriरत्नागिरी