शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

दूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेराव, साटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:17 IST

दोडामार्ग तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.

ठळक मुद्देदूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेरावसाटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग : तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.विविध समस्यांबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर १५ दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर तब्बल साडेतीन तासानंतर घेराव मागे घेण्यात आला.साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्र्रात दूरसंचार विभागाचे जिल्हा प्रबंधक भिसे यांची गुरुवारी नियोजित भेट होती. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचारची सेवा सुरळीत मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच ग्राहकांनी साटेली-भेडशी सेवा केंद्रात ठाण मांडले. मात्र, दुपारपर्यंत भिसे उपस्थित राहिले नसल्याने ग्राहक अधिकच संतप्त झाले.

दुपारच्या दरम्यान भिसे केंद्रात आल्यानंतर ग्राहकांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी कावरेबाबरे झालेल्या भिसे यांनी आपण १० दिवसांपूर्वी येथील कार्यभार स्वीकारला आहे. मला या ठिकाणच्या समस्यांचा अभ्यास करू द्या, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनीही ग्राहकांशी संवाद साधला.मात्र, नागरिकांनी आक्रमक होत प्रत्येकवेळी नवीन अधिकारी हजेरी लावतो आणि वेळ मागतो. पण आमच्या समस्यांचे निराकरण कधीच होत नाही. गेल्या दहा दिवसांत दोन वेळा मनोरा बंद करण्यात आला होता. वीज वितरणचे बिल थकीत आहे. या परिसरात हजारो ग्राहक सेवा घेत आहेत. तरीदेखील कंपनीला बिल भरणे शक्य होत नाही हे दुर्दैव आहे, असे मत नागरिकांनी मांडल्यावर जिल्हा प्रबंधकही निरुत्तर झाले.समस्यांचे समाधान झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. अखेर १५ दिवसांत दूरसंचारच्या सेवेबाबत असलेल्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.यावेळी साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, सदस्य डांगी, कलय्या हिरेमठ, अल्ताफ शेख, संदेश वरक, प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, गोपाळ गवस, सूर्यकांत धर्णे, प्रकाश मोर्ये, वायंंगणतड उपसरपंच प्रथमेशसावंत, गोविंद शिरसाट, भैय्या पांगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग