शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्योद्योगमंत्र्यांना जागा दाखवून देऊ!

By admin | Updated: May 25, 2017 23:08 IST

मत्स्योद्योगमंत्र्यांना जागा दाखवून देऊ!

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या समस्या जाणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवार संवाद’ सभेत बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मच्छिमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पर्ससीन नौकांवरून सर्व्हे करून मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुख्यमंत्र्यांचा पर्ससीनविरोधी आदेश पायदळी तुडविला आहे. मत्स्योद्योगमंत्री पुन्हा सिंधुदुर्गात आल्यास त्यांना पारंपरिक मच्छिमार जागा दाखवून देतील, अशी संतप्त भावना महिला मच्छिमार आकांक्षा कांदळगावकर यांनी व्यक्त करताच मच्छिमारांनीही जानकरांकडून मत्स्य खाते काढून घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘शिवार संवाद’ यात्रेचा प्रारंभ बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अतुल काळसेकर, राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर, अतुल रावराणे, सुदेश आचरेकर, राजन वराडकर, विलास हडकर, बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, भाऊ सामंत, प्रभाकर सावंत, बबलू राऊत, महेश मांजरेकर, गोपीनाथ तांडेल, गंगाराम आडकर, रमेश धुरी, स्नेहा कुबल, ज्योती तोरसकर, आदी भाजप पदाधिकारी व मच्छिमार नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते ‘नीलक्रांती’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व चित्रकला प्रदर्शनाचा प्रारंभ करण्यात करण्यात आला. शिवार संवाद यात्रेला जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सहदेव खडपकर यांनी माशाला पिल्लं घालण्याची संधी द्या. मत्स्य प्रजातींना आरक्षण दिल्यास मच्छिमारांचे प्रश्न सुटू शकतील, असे सांगितले, तर गोपीनाथ तांडेल यांनी सर्जेकोट बंदरात मच्छिमारी व पर्यटन व्यवसाय केले जात असून, एकच जेटी असल्याने नवीन जेटी बांधून मिळावी अशी मागणी करताना एनसीडीसीअंतर्गत मच्छिमारांनी घेतलेल्या कर्जावर कर्जमाफी नको; मात्र व्याजमाफी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. मच्छिमारांच्या मासळीला अपेक्षित भाव मिळण्यासाठी शासनाने शासकीय घाऊक मासळी बाजाराची स्थापना करावी. जिल्हा परिषदेमधून शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना मासेमारीसाठी आवश्यक अवजारे पुरविण्यात यावीत, अशी मागणी मेघनाद धुरी यांनी केली. यावेळी रमेश धुरी, महेंद्र पराडकर, गोविंद केळुसकर यांनी मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. अतुल काळसेकर म्हणाले, जिल्ह्यातील मच्छिमार समाजातील तरुण मासेमारीसोबत पर्यटनपूरक व्यवसायाकडे वळला आहे. किल्ले सिंधुदुर्ग जसे जिल्हावासीयांचे भूषण आहे तसे कवडा रॉक विकसित केल्यास बेरोजगारी नष्ट होऊ शकेल. त्यामुळे येथे पर्यटन जेटी उभारण्यात यावी. यावेळी मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष विकी तोरसकर यांचे कौतुक करण्यात आले. जानकरांबद्दल मौन‘शिवार संवाद’ सभेत मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या समस्यांमागे भावना दडलेल्या आहेत. त्यामुळे, मच्छिमारांनी सुचित केल्यानुसार अंमलबजावणी करणे हे शासन म्हणून माझे कर्तव्य राहील, असे सांगितले. चव्हाण यांनी जानकर यांच्याबद्दल न बोलणेच पसंत केले. सरकारला नमवू नका, असे आवाहन करताना सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रयत्नशील असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले.