शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शिवसेनेने रोखला कमळावर ‘बाण’

By admin | Updated: December 26, 2014 00:12 IST

रत्नागिरी पालिका : समिती सभापतींची आज निवड

रत्नागिरी : येथील नगरपालिकेत सेना-भाजप युती तुटल्यानंतर उद्या, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत सर्व विषय समित्यांची सभापतिपदे शिवसेना व शहर विकास आघाडी यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपकडे व विषय समित्या सेनेकडे अशी विचित्र स्थिती निर्माण होणार आहे. कमळावर शिवसेनेने धनुष्यबाण रोखल्यासारखे हे राजकीय चित्र असून, ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे हुकुमाची काही पाने शिल्लक आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.विधानसभा निवडणुकीत राज्यातील युती तुटली व सर्व राजकीय समीकरणेच बदलून गेली. निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेत पुन्हा ‘युतीचा पाट’ लावला गेला असला, तरी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र त्याचे अनुकरण अद्यापही झालेले नाही. रत्नागिरी नगरपालिकाही त्यातीलच एक ‘राजकीय प्रकरण’ आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपचे मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडून ते शिवसेनेसाठी मोकळे केले नाही, याबाबतची खदखद शिवसेनेत आहे. त्यातूनच नगराध्यक्षांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याआधीच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी नगरसेवकांच्या मदतीने भाजपचाच उपाध्यक्ष निवडून आणायचा व शिवसेनेवर कुरघोडी करायची, असा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, सेनेनेच राष्ट्रवादीचे चार नगरसेवक गळाला लावले व उपनगराध्यक्षपदी सेनेचे संजय साळवी यांची निवड झाली. त्यानंतर भाजपविरुद्ध शिवसेना असे ‘कडवे शीतयुद्ध’ रत्नागिरी पालिकेत सुरू झाले आहे. पालिकेतील शिक्षण, नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी या सहा समित्यांची सभापतिपदे व सदस्य तसेच स्थायी समितीसाठी उद्या निवडणूक होत आहे. यावेळच्या निवडणुकीत एकही सभापतिपद भाजपला मिळू द्यायचे नाही, अशीच रणनीती शिवसेनेने आखली आहे. त्यामुळे भाजपऐवजी यावेळी सेनेबरोबर असलेल्या चारजणांच्या शहर विकास आघाडीला सेनेकडून दोन सभापतिपदे मिळण्याची शक्यता आहे. सर्वच सभापतिपदे सेना-आघाडीने काबीज केल्यास नगराध्यक्ष मयेकर हे एकाकी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संख्याबळ १७रत्नागिरी पालिकेत २८ नगरसेवकांपैकी १३ नगसेवक शिवसेनेचे असून, त्यांना पाठिंबा देणारे शहर विकास आघाडीचे चार नगरसेवक मिळून सेनागटाचे संख्याबळ १७ एवढे झाले आहे. सेनेचे दोन नगरसेवक उमेश शेट्ये व उज्ज्वला शेट्ये हे मूळ राष्ट्रवादीतून सेनेत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना गृहीत न धरताही १५ संख्याबळावर समिती सभापतिपदे काबीज करण्यात सेना-आघाडीला यश मिळेल.भाजपकडे ८, राष्ट्रवादीचे २ व कॉँग्रेसचा १ नगरसेवक असल्याने ११ संख्याबळ झाले, तरी समिती सभापतिपद मिळविताना अवघड जाणार आहे.