शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शिवसेनेत कामांची धमक नाही

By admin | Updated: January 29, 2016 23:59 IST

नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत टोला; चौपदरीकरण कार्यक्रमात सेनेची फजिती

रत्नागिरी : युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना व नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात शिवसेनेची खरी फजिती झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोकणातील विकासकामे करून घेण्याची धमक नाही. त्यामुळे शिवसेना म्हणजे नुसतेच ट्रेलर आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. चौपदरीकरणाच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करत होतो. यामध्ये किती जागा जाणार, त्याचा दर काय मिळणार व मोबदल्याचे पैसे कधी मिळणार याबाबत खुलासा होत नव्हता. जिल्हा प्रशासनाची ही जबाबदारी होती. मात्र, आज गडकरींनी चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाला आपल्याला बोलावले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमात चौपदरीकरणाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत. तसेच जैतापूरपेक्षा जमिनीची अधिक किंमत चौपदरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणीही मान्य झाली असून, हेक्टरी ४० लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम होणार असल्याने कॉँग्रेसने आंदोलने मागे घेतली आहेत. मात्र, कुठेही भूसंपादनावेळी जबरदस्ती झाली तर कॉँग्रेस गप्प बसणार नाही.भिडे नामक व्यक्तीने मुंबई ऐवजी रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्मारक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)1 फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिफायनरीचा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रस्तावापलिकडे त्यात काहीही नाही. १५ हजार एकर म्हणजे काय हे यांनी पाहिलेय काय? त्यातील पाच हजार एकरमध्ये जंगल उभारणार असे ते सांगतात. आधी आहेत ती जंगले वाचवा. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे हे म्हणतात. परंतु, तज्ज्ञांकडून याबाबत खात्री करून घेणार आहे. जर प्रदूषणकारी प्रकल्प असेल तर तीव्र विरोध केला जाईल, असे राणे म्हणाले.2सेनेच्या आमदारांमध्ये दम नाही. हे सरकारमध्ये आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. सेनापक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडायची केवळ धमकी देतात. परंतु, ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. भाजपही चिकट आहे. त्यामुळे सत्ता सोडणार नाही. 3स्मार्ट सिटीच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. मोदी यांनी मुंबईवर सूड उगवण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.