शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी, शिवराम दळवीचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2023 16:43 IST

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात.

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्यावतीने आयोजित आंबोली पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या महोत्सवात स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही? महोत्सवावर लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार व आंबोली येथील हॉटेल उद्योजक शिवराम दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात. देशी-विदेशी पर्यटक आंबोलीचे पावसाळी सौंदर्य पाहण्यासाठी येतात. त्याचाच फायदा घेऊन आत्ताच प्रशासनाला या हंगामात पर्यटन महोत्सव घेण्याची जाग आली. मात्र, त्यांच्या नियोजनाप्रमाणे पर्यटक या महोत्सवाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पर्यटन महोत्सवातून नेमके काय साध्य झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आंबोली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन पत्रिकेत अनेक मंत्री, आमदारांची नावे होती. मात्र, त्यातील एकतरी मंत्री या पर्यटन महोत्सवाला आला का ? मग ही उधळपट्टी कोणासाठी केली गेली. याची चौकशी आम्हाला करावी लागेल. जर शासनाने हा महोत्सव भरविला होता, तर त्यासाठी किती खर्च झाला, हे त्यांनी जाहीर करावे.

आंबोली घाटामध्ये पर्यटक पुरुष व महिला यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही. आंबोलीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सोयी-सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. आधी सुविधा शासनाने द्यायला हव्यात आणि नंतर पर्यटन महोत्सव भरवावा. मी या भागात ४० वर्षांपूर्वी पहिले थ्री स्टार हॉटेल उभारले. त्यामुळे मला आंबोलीतील प्रत्येक भागाविषयी जाण आहे. त्यामुळे आंबोलीत काय सुविधा हव्यात आणि येथील स्थानिकांना काय हवे. याची मला कल्पना आहे, असेही दळवी यांनी म्हटले आहे.