शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंबोलीतील पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी, शिवराम दळवीचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2023 16:43 IST

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात.

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्यावतीने आयोजित आंबोली पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या महोत्सवात स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही? महोत्सवावर लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार व आंबोली येथील हॉटेल उद्योजक शिवराम दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात. देशी-विदेशी पर्यटक आंबोलीचे पावसाळी सौंदर्य पाहण्यासाठी येतात. त्याचाच फायदा घेऊन आत्ताच प्रशासनाला या हंगामात पर्यटन महोत्सव घेण्याची जाग आली. मात्र, त्यांच्या नियोजनाप्रमाणे पर्यटक या महोत्सवाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पर्यटन महोत्सवातून नेमके काय साध्य झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आंबोली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन पत्रिकेत अनेक मंत्री, आमदारांची नावे होती. मात्र, त्यातील एकतरी मंत्री या पर्यटन महोत्सवाला आला का ? मग ही उधळपट्टी कोणासाठी केली गेली. याची चौकशी आम्हाला करावी लागेल. जर शासनाने हा महोत्सव भरविला होता, तर त्यासाठी किती खर्च झाला, हे त्यांनी जाहीर करावे.

आंबोली घाटामध्ये पर्यटक पुरुष व महिला यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही. आंबोलीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सोयी-सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. आधी सुविधा शासनाने द्यायला हव्यात आणि नंतर पर्यटन महोत्सव भरवावा. मी या भागात ४० वर्षांपूर्वी पहिले थ्री स्टार हॉटेल उभारले. त्यामुळे मला आंबोलीतील प्रत्येक भागाविषयी जाण आहे. त्यामुळे आंबोलीत काय सुविधा हव्यात आणि येथील स्थानिकांना काय हवे. याची मला कल्पना आहे, असेही दळवी यांनी म्हटले आहे.