शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“राज्यपालांना केंद्राकडून योग्य सूचना, नंतर चुकीचं वक्तव्य केलं नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:27 IST

शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे काम केलं आहे, दीपक केसरकर यांचा निशाणा.

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील एका भरत गोगावले यांनी केला होता. आता, स्वत: राज्यपालांनी हे पद आपल्यासाठी दु:ख असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यपालांवर भाष्य केलं.

“राज्यपालांना केंद्राकडून योग्य त्या सूचना आल्या असून त्यांनी त्यानंतर कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबत केंद्राकडे आपल्या भावना बोलून दाखवला होत्या,” असं मत केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा अशी सर्वाची अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत आपण प्रवक्ता म्हणून काही बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

पवारांनी शिवसेना संपवायचं कामकेलंशरद पवार यांनी शिवसेना संपवायचे काम केले आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळेच भाजप सोबत युती केली आणि पुढच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

बाळासाहेबांची शिवसेना मुळे मुंबईतील मराठी माणसाला आधार मिळाला असून मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणूस ताठ मानेने फिरेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतना अडीच वर्षांत काय केले? आठवडा आठवडा भर ते मंत्रालयात गेले नाहीत, असं म्हणत केसरकर यांनी टीकेचा बाण सोडला. पैशासाठी फुटलो असतो तर बिर्ला टाटा मुख्यमंत्री झाले असते, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी गुजरात मध्ये जाऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होते. मग नाव कशाला ठेवता सरकारला सहकार्य करा, असं केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSharad Pawarशरद पवार