शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

‘चिपी’वर १२ सप्टेंबरला विमानाचे ‘टेक आॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:04 AM

वेंगुर्ले : चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नसून, येत्या १२ सप्टेंबरला प्रायोगिक तत्त्वावर पहिले ‘टेक आॅफ’ करण्यात येईल. त्यानंतर माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली.दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौऱ्यादरम्यान पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी परुळे, ...

वेंगुर्ले : चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नसून, येत्या १२ सप्टेंबरला प्रायोगिक तत्त्वावर पहिले ‘टेक आॅफ’ करण्यात येईल. त्यानंतर माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली.दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौऱ्यादरम्यान पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी परुळे, भोगवे येथील पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. तर रविवारी चिपी विमानतळ, फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, आरवली व आरोंदा अशा पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. त्यानंतर येथील सागर बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी केसरकर यांनी केंद्रीय हवाईमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस या सर्वांच्या सहकार्यामुळे चिपीमध्ये विमानतळ होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होत आहे, असे सांगितले. विमानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असून, लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. यासंदर्भात आपण आयआरबीला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.माल्टावरून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरणार आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस आंतरराष्ट्रीय विमान उतरण्यासाठी एका कंपनीशी चर्चा झाली आहे. चिपी विमानतळाची धावपट्टी अडीच किलोमीटरची आहे व ती पुढे सव्वातीन किलोमीटर केली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.महिन्याभरात जिल्ह्यातील बारापैकी आठ कॉयर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सधन जिल्हा होणार आहे. ‘जय जवान, जय किसान’ अंतर्गत आंबा, काजू, नारळ उत्पादक शेतकºयांना यांत्रिकी सुविधा पुरविण्यात येतील. सावंतवाडी येथे एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रम सेंटर सुरू करण्यात येत आहे. ज्या युवकांना हॉटेल क्षेत्रात काम करायचे असेल अशांसाठी वेंगुर्ले व आंबोली येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपण ५० सीटच्या पाणबुडीची मागणी केली होती. मात्र, सध्या परदेशात २६ सीटची पाणबुडी तयार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशातील पहिलीच २६ सीटर पाणबुडी वेंगुर्ले येथे दाखल होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पर्यटन, चिपी विमानतळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील भागात विकासकामे केली जातील. मच्छिमारांसाठी ८०० पैकी ४०० बोटींना आऊटबोट इंजिन देण्यात येणार असून, पिंजºयातील मत्स्यशेती करणाºया गटांना ५० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मासळी बाहेर पाठविण्यासाठी वातानुकूलित वाहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व बंदरांचे आधुनिकीकरण करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.लघुउद्योगासाठी कर्जयेत्या तीन महिन्यांच्या कालावधीत चिपी विमानतळ परिसरात ३०० ते ४०० कॉटेजीस उभे करण्यात येणार आहेत. येथील स्थानिकांच्या घराघरांमध्ये छोट्या स्वरूपाचे कॉटेज सुरू ंकरून त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी ज्या स्थानिकांच्या जमिनी विमानतळासाठी संपादित झालेल्या आहेत, त्यांनी पुढे यावे. त्यांना ५० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.