शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:31 IST

ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे  सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.

कणकवली: ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे माजी आमदार डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा य. बा. दळवी (वय१००)यांचे रविवारी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. 'आमचे डॉक्टर' या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरिचीत असणारे डॉ.य. बा. दळवी १९६२साली कणकवली व त्यानंतर १९७८ मध्ये कणकवली - मालवण या विधानसभा मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते.

ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे  सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते. १९५३ साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले कणकवली तालुक्यातील गाव कळसुली गाठले. त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये आजारी पडेपर्यंत अविरत रुग्णसेवा त्यांनी केली. ती तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत. अडलेली बाळंतीण आणि सर्पदंशाने बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रात्री अपरात्री बॅग उचलून ४, ५ मैल ते जात असत.त्यामुळे 'गरिबांचा डॉक्टर' अशी उपाधीही त्यांना मिळाली होती.

आपल्या गावासाठी हायस्कूल आणि ओसरगाव- कळसुली तसेच कणकवली- हळवल- शिरवल मार्गे रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले.त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.थोर समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांनी हेरलेले हे रत्न पुढे प्रा. मधु दंडवते यांचा खंबीर साथी म्हणून नावारूपाला आले. कोकणात समाजवादी चळवळीला बळ देण्यात ते आघाडीवर होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. साधना, सुपुत्र ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजीत तसेच कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया मुलचंदानी तसेच नातवंडे-पतवंडे आहेत. नातू अनिरुद्ध हा सध्या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

'आपले हे हात सेवेसाठी आहेत, ते आता जरी थकले असले तरी शेवटच्या श्‍वासापर्यंत सेवा करत राहावी असे वाटते. मला दोनवेळा आमदारकी मिळाली, पण त्यात मी रमलो नाही. मंत्री खोटी उत्तरे देतात त्याची मला चीड यायची, ते ऐकावेसे वाटत नव्हते . आमच्या कोकणातील कार्यकर्ते नेक होते, रद्दीवर झोपत आणि उपाशीपोटी काम करत. त्यांच्यासाठी, समाजासाठी मी काही करू शकणार नाही अशी माझी पक्‍की खात्री झाली आणि म्हणूनच आपण वैद्यकीय सेवा करण्याला महत्व दिले. राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे, तसे झाले तर देशाचे भले होईल .आपण अनेक रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकलो ते केवळ दैवी पाठबळामुळेच असे डॉ.य.बा. दळवी सांगत असायचे. 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया