शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सागरी मार्गावर सुरक्षा ‘कवच’

By admin | Updated: November 19, 2015 00:46 IST

आज होणार सांगता : जिल्ह्यातील किनारपट्टीवर ३६ तासांच्या मोहिमेस प्रारंभ

मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलातर्फे राबवण्यात येणारे सागर सुरक्षा कवच मोहिमेस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आज (बुधवारी) सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. ३६ तास चालणारी ही मोहीम गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेसाठी मालवण, आचरा येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून ८ अधिकाऱ्यांसह ९० कर्मचाऱ्यांच्या टीमने मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील केले आहेत. सागरी किनारपट्टी ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहे. या किनारपट्टीवरील सुरक्षेला छेद देताना दहशतवाद्यांनी थेट देशाची आर्थिक राजधानी २६/११ च्या हल्ल्यांनी हादरवली होती. मात्र त्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य दिले गेले. काही महिन्यांच्या अंतराने किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच मोहीम राबवून अभेद्य सुरक्षेचा आढावा घेतला जातो. मालवण किनारपट्टी भागातील मालवण आचरा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ठिकाणी स्पीड बोट, गस्त, मोटरसायकल तसेच तोंडवळी, आचरा येथे दोन टॉवर यांच्या माध्यमातून तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी करत (मालवण, आचरा) ८ अधिकाऱ्यांसह ९० सशस्त्र पोलीस कर्मचारी व सागर रक्षक सदस्य यांच्या सहकार्याने किनारपट्टी सील करण्यात आली आहे. समुद्रात बोटींची तर रस्त्यावर सर्वच वाहने तपासली जात आहेत. तर अन्य संशयास्पद हालचालीवर, व्यक्तीवर करडी नजर ठेवली जात आहे. मालवण प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम सशस्त्र पहारा देत आहेत. (प्रतिनिधी) रेड टीम ब्ल्यू टीमचे सुरक्षा कवच भेदणार? ४या मोहिमेत सागरी सुरक्षेस असणाऱ्यांना ब्ल्यू टीम म्हणून या मोहिमेत ओळखले जाते. तर कोणत्याही प्रसंगाला ही ब्ल्यू टीम सज्ज आहे का? हे पाहण्यासाठी वेगळ्या प्रांतातील पोलिसांचीच रेड टीम ही सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करण्यासाठी सज्ज असते. जर रेड टीमला पकडण्यात ब्ल्यू टीम यशस्वी ठरली तर ब्ल्यू टीम पात्र ठरते. मात्र, रेड टीम ब्ल्यू टीमची सुरक्षा भेदण्यात यशस्वी ठरली तर ब्ल्यू टीमला कारवाईस तयार रहावे लागते. एकूणच या मोहिमेतून सागरी सुरक्षेचा लेखाजोगा मांडला जातो. उद्या गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या मोहिमेची सांगता होणार आहे.