शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

माध्यमिक शाळांमधील २०१२ नंतरची भरती धोक्यात!

By admin | Updated: November 17, 2016 00:27 IST

हजारो शिक्षकांवर गंडांतर? : दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारीचा निर्णय

सागर पाटील-- टेंभ्ये --माध्यमिक शाळांमध्ये २ मे २०१२ नंतर करण्यात आलेली शिक्षक भरती धोक्यात आली आहे. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत रीतसर परवानगी न घेता अनेक ठिकाणी पदभरती करण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही पदांना मान्यताही देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या मान्यतांची पुनर्तपासणी शासनस्तरावरून करून यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व आवश्यकता वाटल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के समायोजनासाठी राज्य शासनाने २ मे २०१२ रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन झाल्याशिवाय कोणत्याही पदभरतीस मान्यता देण्यात येणार नसल्याचे त्यात स्पष्ट केले होते. म्हणजेच एका अर्थाने राज्यातील शिक्षक भरतीवरील ही बंदीच होती. राज्यात रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याने व काही महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांची कमतरत निर्माण झाल्याने शासन स्तरावरून २०१२ च्या शासन निर्णयात २०१४ मध्ये अंशत: बदल करण्यात आला. यासंदर्भातील एका याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ जून २०१६ रोजी निर्णय दिला आहे. शिक्षण उपसंचालकांनी, शिक्षणाधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नसल्याचे प्रमाणित केल्याशिवाय पदभरती करण्यात येऊ नये, तसेच नाहरकत प्रमाणपत्राशिवाय पदभरती केलेल्या पदांना वैयक्तिक मान्यता देण्यात येऊ नये, असे या खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. तसेच मान्यता प्राप्त न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित व्यवस्थापनाने अदा करावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.न्यायालयाच्या या आदेशाला अनुसरून मे २०१२ नंतर ना हरकत प्रमाणपत्राशिवाय करण्यात आलेल्या पदभरतीस कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्यात येऊ नये व मान्यता दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व आवश्यक वाटल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अध्यादेशही जारी केला आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.नियम डावलून पदभरती : २०१४ मधील शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शाळेत शिक्षक भरतीसाठी समिती निर्माण करण्यात आली होती. शिक्षण संस्थांनी शिक्षण विभागाकडून रीतसर परवानगी घेतल्यानंतर या समितीच्या माध्यमातून भरती करणे अपेक्षित होते, परंतु काही शिक्षण संस्थांनी हे सर्व नियम बाजूला सारून शिक्षक भरती केली असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक स्तरावरून काही पदांना मान्यताही देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.