शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

४० केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून योजनांची चाचपणी; राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 20:48 IST

सन २०२४ ची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या, सामान्यांच्या त्याबाबत प्रतिक्रीया काय आहेत?

महेश सरनाईक 

तळेरे (सिंधुदुर्ग) : सन २०२४ ची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या, सामान्यांच्या त्याबाबत प्रतिक्रीया काय आहेत? हे ४० केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहे. प्रत्येक राज्याचा राजकिय आराखडा तयार करणार असून त्याबाबत देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. असे सांगतानाच लोकसभा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास इच्छूक असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रीय महामंत्री तथा लोकसभा प्रवास योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांनी तळेरे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या लोकसभा प्रवास योजनेची विशेष बैठक तळेरे येथील स्मित मल्टीपर्पज हॉल येथे झाली. त्यावेळी पत्रकारांशी तावडे बोलत होते. यावेळी लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश सचिव निलेश राणे, कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, आमदार नितेश राणे, लोकसभा प्रभारी संदीप लेले, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, अतुल काळसेकर, अजित गोगटे आदी उपस्थित होते.

गतवेळच्या १०७ जागा जिंकण्यासाठीची रणनिती

विनोद तावडे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभेला भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. २०२४ ला त्यापुढील १०७ जागांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी राजकिय वस्तुस्थितीचे विश्लेषण करुन नेत्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. १०७ जागांपैकी ७० ते ८० जागा कशा जिंकता येतील याची रणनिती बनविली आहे.

लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार म्हणून आपण इच्छुक आहात का? याबाबत तावडे म्हणाले की, लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाला नसून पाच-सहा महिन्यांनंतर उमेदवार निश्चित होईल. त्यासाठी मी इच्छूक नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. तर सध्याच्या राजकिय स्थितीवर तावडे म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. मात्र, सध्या पक्ष आणि नेताही मजबूत नाही. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.