शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून योजनांची चाचपणी; राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 20:48 IST

सन २०२४ ची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या, सामान्यांच्या त्याबाबत प्रतिक्रीया काय आहेत?

महेश सरनाईक 

तळेरे (सिंधुदुर्ग) : सन २०२४ ची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या, सामान्यांच्या त्याबाबत प्रतिक्रीया काय आहेत? हे ४० केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहे. प्रत्येक राज्याचा राजकिय आराखडा तयार करणार असून त्याबाबत देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. असे सांगतानाच लोकसभा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास इच्छूक असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रीय महामंत्री तथा लोकसभा प्रवास योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांनी तळेरे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या लोकसभा प्रवास योजनेची विशेष बैठक तळेरे येथील स्मित मल्टीपर्पज हॉल येथे झाली. त्यावेळी पत्रकारांशी तावडे बोलत होते. यावेळी लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश सचिव निलेश राणे, कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, आमदार नितेश राणे, लोकसभा प्रभारी संदीप लेले, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, अतुल काळसेकर, अजित गोगटे आदी उपस्थित होते.

गतवेळच्या १०७ जागा जिंकण्यासाठीची रणनिती

विनोद तावडे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभेला भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. २०२४ ला त्यापुढील १०७ जागांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी राजकिय वस्तुस्थितीचे विश्लेषण करुन नेत्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. १०७ जागांपैकी ७० ते ८० जागा कशा जिंकता येतील याची रणनिती बनविली आहे.

लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार म्हणून आपण इच्छुक आहात का? याबाबत तावडे म्हणाले की, लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाला नसून पाच-सहा महिन्यांनंतर उमेदवार निश्चित होईल. त्यासाठी मी इच्छूक नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. तर सध्याच्या राजकिय स्थितीवर तावडे म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. मात्र, सध्या पक्ष आणि नेताही मजबूत नाही. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.