शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:41 IST

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार सभापतींचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सभापती अनुश्री कांबळी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.महाराष्ट्र राज्यात रविवारी सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसविले जातात. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूलमधील केंद्रात रविवारी जे विद्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विद्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले.

पालकांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी याबाबत आवाज उठवित त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली? याचा जाब विचारला.दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूलमध्ये धाव घेत पाहणी केली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले मातोंड हायस्कूलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.

शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात. त्यावेळी या शाळेतील मुलांकडून एकावेळी एका विषयाचे तीन किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ््या मुलांची नावे असतात, असे यावेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले.यावेळी कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपू परब, तुळसचे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.शिक्षण विभागाने कारवाई करावीघाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरीटमध्ये यावीत, यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्लासला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कूलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन