शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सावंतवाडीला गारांच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

नागरिकांची तारांबळ : कुडाळसह दोडामार्ग तालुक्यात तुरळक सरी

सावंतवाडी : सावंतवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसासह गारा पडल्या. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाच्या सरीसह पडलेल्या गारांचा आनंद येथील लहान मुलांसह नागरिक लुटताना दिसत होते. मात्र, दोन तास पडणाऱ्या या पावसामुळे आंबा व काजू बागायतदार होणाऱ्या नुकसानीमुळे चिंतेत पडले आहेत. जिल्ह्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. गुरुवारी कणकवली तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच शुक्रवारी या पावसाने जिल्हाभर उपस्थिती दर्शविली. सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास आभाळ दाटून आले होते. मात्र, गेले चार दिवस ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना पाऊस पडेल असे अपेक्षित नव्हते. मात्र, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने चाल केली. यावेळी सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी गारा पडल्या. या गारांच्या पावसाचा आनंदही अनेक ठिकाणी लहान मुलांसह युवकांनीही घेतला. गारा गोळा करत त्याचे फोटो काढत युवकांनी सोशल मीडियावर टाकले. अवचितपणे पडलेल्या गारांमुळे शेतकरी व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडलेले दिसत आहेत. सावंतवाडीतील बांदा परिसरातही तासभर पाऊस पडत होता. यामुळे बांदा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते. (प्रतिनिधी)पावसापुढे बागायतदार, शेतकरी हतबलगारांचा पाऊस झाल्याने येथील शेतकरी व बागायतदारांच्या हातातील उत्पादनावर पाणी पडले आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्याला पुरते नामोहरण केले आहे. बागायतदारही निसर्गाच्या या कोपामुळे त्रस्त आहेत. अचानक लागणाऱ्या आगींमुळे शेकडो एकर बागायती जळून गेल्या असतानाच उरलेल्या उत्पादनाच्या आशेवर असलेल्या बागायतदारांची या गारपीटीसह पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान केले आहे.वेंगुर्ले, कुडाळात हजेरी, दोडामार्गात तुरळक सरीकुडाळ व वेंगुर्ले तालुक्यात पावसाने दुपारी हजेरी लावली. अचानक गडगडाटासह सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. तसेच छत्र्या वा रेनकोट नसल्याने बरेच वाहनचालक भिजतच प्रवास करत होते. या अवकाळी पावसामुळे कुडाळ व वेंगुर्ले परिसरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दोडामार्ग तालुक्यात मात्र, दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अन्य ठिकाणांप्रमाणे दोडामार्गात केवळ तुरळक सरी पडल्या.