शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धो धो पावसाने सावंतवाडीकरांची तारांबळ, शहरात घुसले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 18:03 IST

पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी येण्याची भीती महसूल विभागाने व्यक्त केली आहे.

सावंतवाडी : रविवारी सायंकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी सकाळी तर सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकात पाणी आले होते. पाणी चार ते पाच दुकानात शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तर  चितारआळी भागात संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यात आंबोली घाटात दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूकही ठप्प झाली होती. तर चौकूळ येथेही नदी तुडूंब भरून वाहत होती. तसेच झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे पाणी आल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी येण्याची भीती महसूल विभागाने व्यक्त केली आहे.सावंतवाडी तालुक्यात रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी ही पावसाचा जोर तसाच होता. पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने मोती तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. तसेच शहरातील जयप्रकाश चौकात अनेक दुकानात पाणी शिरले होते. तर रस्त्यात पाणी भरल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे बाजारातही सकाळच्या सत्रात तुरळक माणसे दिसत होती. सोमवार असूनही बाजारात गर्दी नव्हती. येथील चितारआळी भागातही पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. यात कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्याने आंबोली, चौकुळ तसेच नेमळे, निगुडे अशा अनेक गावांना याचा फटका बसला आहे. आंबोली घाटातील दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर माती बाजूला करून वाहतुक सुरळित सुरू झाली. त्या शिवाय चौकुळ येथील नदीलाही पूर आला आहे. तर नेमळे येथे झाराप पत्रादेवी महामार्गावर पाणी आल्याने अनेक मोठे वाहनधारक रस्ता शोधत मार्ग काढताना दिसत होते. दुपारी उशिरा येथील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली होती.पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे उशिरापर्यंत झाले नव्हते, असे महसूल विभागाने स्पष्ट केले. ही हानी सुमारे पाच ते दहा लाख रूपयांच्या घरात जाउ शकते, असे मत महसूलच्या अधिकाºयांनी व्यक्त केले. मात्र या पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.