शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी, वेंगुर्लेत लढत युतीशिवाय

By admin | Updated: November 1, 2016 23:43 IST

राजन तेली : नगरपालिका निवडणूक; सेनेशी युती नाही; केसरकर यांची दिशाभूल

सावंतवाडी : सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती व्हावी, ही आमची इच्छा होती, पण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्यानेच युती झाली नाही. युती झाल्याबाबत कोण गैरसमज पसरवित असेल, तर त्याकडे कोणी लक्ष देऊ नये. भाजप सावंतवाडी व वेंगुर्लेत स्वबळावर निवडणूक लढणार आहे, असे माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. आता शिवसेनेबरोबर युती कदापि शक्य नाही. आमची लढत काँग्रेसबरोबर नसून शिवसेनेबरोबरच आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक उमाकांत वारंग, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, राजू गावडे, महेश पांचाळ, अमित परब आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार तेली म्हणाले, मालवण व देवगड येथे जर युती होत असेल, तर वेंगुर्ले व सावंतवाडी येथेच युती का नाही? पालकमंत्री दीपक केसरकर हे भाजप नगण्य आहे, अशी आमची खिल्ली उडवित राहिले. त्यामुळेच युतीला वेळ झाला. आता युतीची बोलणी करण्याची वेळ निघून गेली असून, भाजप सतरा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. जर पालकमंत्री दीपक केसरकर युतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याचे सांगत असतील, तर आमच्या वरिष्ठांना घडलेल्या घडामोडी पटवून दिल्या जातील. मंत्री रवींद्र चव्हाण हे युती करण्यासाठी तीन दिवस सावंतवाडीत ठाण मांडून होते. मग या बैठकीला मंत्री केसरकर का आले नाहीत? असा सवाल करीत मंत्री केसरकर यांना युती करायची नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असून, भाजपच्या उमेदवारांमध्ये तसेच जनतेत ते गैरसमज पसरविण्याचे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही युती करणार नाही. त्यामुळे मंत्री केसरकर हे दिशाभूल करीत असतील तर त्याला बळी पडू नका, असे आवाहनही माजी आमदार तेली यांनी यावेळी केले. पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री केसरकर यांनी तत्कालीन भाजपच्या नेत्यांना नगरपालिकेत आपल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार, असे आश्वासन दिले होते. मग अद्यापपर्यंत हे आश्वासन का पाळण्यात आले नाही, असा सवाल करीत भाजप सतराही जागा लढवून सावंतवाडी शहरात आमची ताकद किती आहे ती अजमावून बघेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अन्नपूर्णा कोरगावकर यांची समजूत काढणार ४गेली दोन वर्षे महिला तालुकाध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी चांगले काम केले आहे. मात्र, काही अडचणींमुळे प्रभाग ५ मधून त्यांना उमेदवारी देता आली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ४मात्र, भाजप वरिष्ठ पातळीवरून नक्की त्यांची समजूत काढेल, असेही यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले.