शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

सावंतवाडी, वेंगुर्लेत लढत युतीशिवाय

By admin | Updated: November 1, 2016 23:43 IST

राजन तेली : नगरपालिका निवडणूक; सेनेशी युती नाही; केसरकर यांची दिशाभूल

सावंतवाडी : सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती व्हावी, ही आमची इच्छा होती, पण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्यानेच युती झाली नाही. युती झाल्याबाबत कोण गैरसमज पसरवित असेल, तर त्याकडे कोणी लक्ष देऊ नये. भाजप सावंतवाडी व वेंगुर्लेत स्वबळावर निवडणूक लढणार आहे, असे माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. आता शिवसेनेबरोबर युती कदापि शक्य नाही. आमची लढत काँग्रेसबरोबर नसून शिवसेनेबरोबरच आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक उमाकांत वारंग, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, राजू गावडे, महेश पांचाळ, अमित परब आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार तेली म्हणाले, मालवण व देवगड येथे जर युती होत असेल, तर वेंगुर्ले व सावंतवाडी येथेच युती का नाही? पालकमंत्री दीपक केसरकर हे भाजप नगण्य आहे, अशी आमची खिल्ली उडवित राहिले. त्यामुळेच युतीला वेळ झाला. आता युतीची बोलणी करण्याची वेळ निघून गेली असून, भाजप सतरा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. जर पालकमंत्री दीपक केसरकर युतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याचे सांगत असतील, तर आमच्या वरिष्ठांना घडलेल्या घडामोडी पटवून दिल्या जातील. मंत्री रवींद्र चव्हाण हे युती करण्यासाठी तीन दिवस सावंतवाडीत ठाण मांडून होते. मग या बैठकीला मंत्री केसरकर का आले नाहीत? असा सवाल करीत मंत्री केसरकर यांना युती करायची नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असून, भाजपच्या उमेदवारांमध्ये तसेच जनतेत ते गैरसमज पसरविण्याचे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही युती करणार नाही. त्यामुळे मंत्री केसरकर हे दिशाभूल करीत असतील तर त्याला बळी पडू नका, असे आवाहनही माजी आमदार तेली यांनी यावेळी केले. पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री केसरकर यांनी तत्कालीन भाजपच्या नेत्यांना नगरपालिकेत आपल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार, असे आश्वासन दिले होते. मग अद्यापपर्यंत हे आश्वासन का पाळण्यात आले नाही, असा सवाल करीत भाजप सतराही जागा लढवून सावंतवाडी शहरात आमची ताकद किती आहे ती अजमावून बघेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अन्नपूर्णा कोरगावकर यांची समजूत काढणार ४गेली दोन वर्षे महिला तालुकाध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी चांगले काम केले आहे. मात्र, काही अडचणींमुळे प्रभाग ५ मधून त्यांना उमेदवारी देता आली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ४मात्र, भाजप वरिष्ठ पातळीवरून नक्की त्यांची समजूत काढेल, असेही यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले.